बेंगळूर न्यायालयातील सुनावणी 16 सप्टेंबरपर्यंत लांबणीवर
बेळगाव / प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतची उच्च न्यायालयातील सुनावणी दि. 16 सप्टेंबरपर्यंत लांबणीवर पडली आहे. त्यामुळे निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. पण धारवाड खंडपीठातील याचिकेची सुनावणी सोमवार दि. 16 रोजी होणार आहे. त्याचदिवशी महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल काय लागणार याकडे बेळगावकरांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बेंगळूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याची सूचना याचिकेच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला केली होती. पण कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तसेच तिसऱया लाटेची शक्मयता असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर 2021 पर्यंत लांबणीवर टाकण्याची विनंती राज्य निवडणूक आयोग आणि उच्च न्यायालयात राज्य सरकारच्यावतीने करण्यात आली होती. पण मंत्रीमंडळात झालेल्या निर्णयाची माहिती तसेच निवडणुका कधी घेणार याबाबतचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची सूचना न्यायालयाने राज्य सरकारला केली होती. त्यामुळे याबाबत शुक्रवार दि. 13 रोजी बेंगळूर उच्च न्यायालयात सुनावणी होती. मात्र ही सुनावणी देखील दि. 16 सप्टेंबरपर्यंत लांबणीवर गेली आहे. त्यामुळे आता निवडणूका होणार हे निश्चित झाले आहे.
राज्यातील तीन महापालिकांच्या निवडणुकांसाठी बुधवारी अधिसूचना जारी करण्यात आली. पण सध्या निवडणुका घेण्यासाठी योग्य वेळ नसल्याने निवडणुकांबाबत नाराजी व्यक्त होत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अशा स्थितीत निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. निवडणुका जाहीर झाल्याने रद्द करणे अशक्मय आहे. त्यामुळे बेंगळूर उच्च न्यायालयात होणाऱया सुनावणीनंतर महापालिका निवडणुकीचे भवितव्य ठरणार होते. मात्र ही सुनावणी दि.16 सप्टेंबरपर्यत पुढे गेली आहे. बेळगाव महापालिका वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाबाबतची सुनावणी धारवाड खंडपिठाच्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ही सुनावणी सोमवार दि. 16 रोजी होणार आहे. त्यामुळे आता शहरवासियांचे लक्ष सोमवारच्या सुनावणीकडे लागले आहे.
निवडणूक वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया लांबणीवर टाकणे अशक्मय आहे. त्यामुळे बेंगळुर न्यायालयाने निवडणूकीला स्थगिती दिली नाही. पण बेंगळूर उच्च न्यायालयातील याचिकेत बेळगाव महापालिकेला प्रतिवादी करण्यात आले नाही. तरीदेखील बेळगाव महापालिकेचा समावेश करण्यात आला आहे. बेळगाव आणि बळळारी महापालिकेच्या निवडणूकीबाबत धारवाड खंडपीठाच्या न्यायालयात याचिका सुरू आहे. पण बेंगळुर न्यायालयाने केवळ बळळारी महापालिकेला वगळुन निकाल दिला आहे. त्यामुळे बेळगाव महापालिकेबाबत धारवाड खंडपीठाच्या उच्च न्यायालय कोणती भूमिका घेणार याकडे बेळगावकरांचे लक्ष लागले आहे.