समाजामध्ये एका माणसाला साधारणतः कधी मान्यता मिळते? जेव्हा तो उच्च शालेय शिक्षण घेऊन, चांगल्या पगाराची, चांगली नोकरी करतो आणि समाजाच्या आर्थिक उद्धारामध्ये हातभार लावतो तेव्हा त्याला जबाबदार नागरिक म्हटले जाते. समाजाच्या यशाच्या व्याख्या खूप भौतिकवादी झाल्या आहेत. एक विशिष्ट प्रकारची जीवनशैली असली, तरच तो माणूस समाजाचा भाग होऊ शकतो. पैसे, गाडी, चार भिंतीत सीमित असलेले घर आणि एक ठरावीक दिनचर्या असणे माणसाला समाजमान्य वाटते. या चौकटीबाहेर काहीही अपारंपरिक मानले जाते.
पण जगभर आणि भारतामध्येदेखील अशा काही जमाती आहेत ज्यांनी स्वतःला समाजाच्या या शर्यतीतून अलग केले आहे. तरीसुद्धा, आपल्या संस्कृती, आपल्या समुदायाप्रती ऐक्मय आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱया कित्येक जमाती आजही देशभर पसरल्या आहेत. प्रत्येक जमातीचे राहणीमान, त्यांची वेशभूषा, त्यांच्या प्रथा इतक्मया भिन्न असूनही त्यांच्या संस्कृतीच्या वारसाचे मूळ एकच आहे, निसर्गाशी एकरूप होऊन आपल्या माणसांसह व आपल्या माणसांसाठी कार्य करावे. अशाच काही अद्वितीय प्रथा, वेशभूषा आणि राहणीमान असलेल्या आदिवासी समाजांबद्दल आज जाणून घेऊया.
1. सेंतीनलिझ जमात-
जगातील सर्वात गुप्त आदिवासी जमातीमधली एक म्हणजे सेंतेनेलिझ जमात आहे. आधुनिक जगाशी या जमातीला अजिबात संबंध ठेवायचा नाही आहे. त्यांच्या बेटावर जगातील इतर कोणी माणूस आढळलाच तर तो कधीही परत येत नाही. अनेक वर्षे त्यांनी आपली संस्कृती जगापासून लपवून ठेवली आहे. नॉर्थ सेंतीनल नावाच्या बेटावर स्थायिक असलेल्या या जमातीत साधारण 80 ते 150 लोक आहेत. पण याचा खरा आकडा कोणालाच माहिती नाही. ही जमात त्यांच्या विणलेल्या जाळीच्या टोपल्यांसाठी प्रसिद्ध आहे.
आता प्रश्न असा पडतो की या जमातीला जगाचा भाग व्हायला का आवडत नाही? 1881 साली भारतीय नौदलाचे निनेवाह नावाचे जहाज या बेटावर जाऊन पोहोचले. त्यातील 20 लोक पोहत या बेटाच्या किनाऱयावर पोहोचले आणि याला विरोध म्हणून तेथील लोकांनी त्यांच्यावर लोखंडी टोक असलेल्या बाणाने वार केला. आता तो का केला याचे उत्तर कोणालाच माहीत नाही पण याने एक सिद्ध होते की तिथे बाहेरच्या माणसांना थारा नाही.
2. चेंचुस जमात-
आंध्र प्रदेश राज्यात स्थायिक असलेली ही जमात तेलुगू भाषेच्या एका चेंचू नावाच्या भाषेतच संवाद साधते. पारंपरिक भारतीय संस्कृतीशी तुलना केली तर त्या मानाने या जमातीचे विचार फार विकसित आहेत. या जमातीतील तरुण-तरुणींना आपल्या मनपसंत जोडीदाराशी लग्न करायचे स्वातंत्र्य आहे.
इथे घटस्फोट, विधूर व विधवा यांचे पुनर्विवाह या विषयांना खूप समजुतीने हाताळले जाते. त्यांच्यासाठी समाजमान्य नियमांपेक्षा प्रेम ही भावना अधिक उच्च आहे. आणि म्हणूनच त्यांच्यामधील एकीला दाद दिली पाहिजे. त्यांच्याकडे आधुनिक सुविधा, जगात यशस्वी होण्याच्या संधी जरी मर्यादित असल्यातरी फक्त प्रेम आणि जिव्हाळय़ाच्या जोरावर ते आज सुखाने नांदत आहेत.
3. भिल
राजस्थानमधील भिल जमात ही एक स्त्रीप्रधान जमात आहे. येथील स्त्रियांना आणि पुरुषांना समान वागणूक दिली जाते. स्त्रियांनी कुठे फिरावे, कसे दिसावे आणि कसे वागावे याला अजिबात बंधन नाही. एवढेच काय, तर एक अपारंपरिक गोष्ट अशी येथील स्त्रिया एकापेक्षा जास्त वेळेला लग्न करू शकतात. आपण म्हणतो की शिक्षणामुळे माणूस जास्त विकसित होतो. पण या माणसांनी आपल्या पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीवरून हे दाखवून दिले आहे की माणसाचे शिक्षण त्याला श्रे÷ बनवत नाही तर त्याची मानसिकता त्याच्या चारित्र्याचे प्रतीक
ठरते.
4. संथाल
पूर्व भारतातली ही जमात जराशी निराळी आहे. त्यांची संस्कृती म्हणजे आधुनिक आणि पाश्चात्य याचे एक अद्भूत मिश्रण आहे. संथाली भाषेव्यतिरिक्त तेथे इतरही भाषा बोलल्या जातात. या जमातीचा देवावर विश्वास नाही. त्यांना अगदीच नास्तिक असेही म्हणता येणार नाही कारण त्यांची अध्यात्माची भावना थोडी वेगळी आहे. ते कुठल्याही मूर्तीचे पूजन करत नाहीत, पण त्यांच्या देवांचे पूजन करतात. भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये तेहतीस कोटी देव आहेत.
पण या जमातीसाठी देव हा सर्वत्र आहे. ही जमात कोणत्याही देव दैवतांचे पूजन करत नसून चक्क भूत पिशाच्चांना वंदन करते. संथाल जमातीतील लोकांना नाच आणि गाणेदेखील खूप आवडते. ही जमात त्यांच्या नैसर्गिकरीत्या बनवलेल्या वाद्यांसाठीसुद्धा ओळखली
जाते.
5.पटूआ-
पटचित्र या चित्रकलेचे नाव ऐकले आहे का? या प्रसिद्ध चित्रकलेचा उगम हा पटूआ नावाच्या जमातीतून झाला आहे. बंगालमध्ये स्थाईक असलेली ही जमात अतिशय सर्जनशील आहे. पटचित्र ही चित्रकला एका विलक्षणरित्या लोकांसमोर मांडली जाते. ही चित्रे चित्रकार लोकांसमोर गाणी आणि नृत्य सादर करता करता प्रदर्शित करतात. या सादर केल्या जाणाऱया गाण्यांना पतेर गान असे म्हणतात. आणि या चित्रकलेसाठी ही जमात नैसर्गिक चिकणमाती, पाने, फुले आणि झाडांपासून बनवलेले रंग वापरतात. यामुळे या चित्रांचे कौशल्य अधिकच वाढते.
ही पाच केवळ उदाहरणे आहेत. अशा साधारण 645 आदिवासी जमाती फक्त भारतात बघायला मिळतील. जर प्रत्येक जमातीची संस्कृती अद्वितीय असेल तर इतिहासाचा, कलेचा आणि संस्कृतीचा केवढा मोठा साठा आपल्याकडे दडलेला आहे. प्रत्येक जण जगामध्ये काही ना काहीतरी उद्देश घेऊन आला आहे.
श्रीमंती, पैसा, प्रसिद्धी आणि ऐशोआराम असला तरच माणूस सुखी होऊ शकतो. या कल्पनेतून जर आपण बाहेर पडलो तर आपण माणसाचे खरे सामर्थ्य ओळखू शकतो. माणसाचे सामर्थ्य हे कधी पैशाने तोलले जाऊच शकत नाही. कारण पैसा ही मानवी निर्मिती आहे. पण निसर्ग, एकाग्रता आणि सर्जनशीलता या खूप नैसर्गिक गोष्टी आहेत. माणसाचे खरे कौशल्य ओळखायला गरज आहे ती फक्त समाजमान्य यशस्वी माणसाच्या कल्पनेतून बाहेर पडायची आणि माणूस म्हणून माणसाचा स्वीकार करायची. शेवटी आपण निसर्गापेक्षा भिन्न नसून, निसर्गाचाच एक भाग
आहोत!
-श्राव्या माधव कुलकर्णी