मराठी साहित्य महामंडळाचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
सीमाभागामध्ये दरवषी मराठी साहित्य संमेलने भरविली जातात. ती परंपरा खंडीत होवू नये यासाठी यावर्षी आम्हीं साहित्य संमेलने भरवत आहोत. कोरोनाचे सर्व नियम व अटी पाळून आम्ही साहित्य संमेलने भरवू, तेंव्हा आम्हाला साहित्य संमेलने भरविण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मराठी साहित्य महामंडळ यांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
बेळगाव तालुक्मयातील कडोली, उचगाव, बेळगुंदी, निलजी, कुदेमानी, सांबरा, माचिगड (ता. खानापूर), चिकोडी तालुक्मयातील शट्टीहळ्ळी, हक्केरी तालुक्मयातील कारदगा या ठिकाणी दरवषी आम्ही साहित्य संमेलने भरवितो. हा एक उत्सव आहे. आम्ही भाषेचे जतन करण्यासाठी दरवषी साहित्य संमेलन भरवितो. यावषी मराठीसह उर्दु व इतर भाषिक जनताही भाग घेते. तेंव्हा याचा विचार करुन आम्हाला साहित्य संमेलन भरविण्यास कोणतीही आडकाठी करु नये, अशी विनंती करण्यात आली.
सध्या कोरोनामुळे संपूर्ण जगच हादरले आहे. बेळगाव जिह्यात गेल्या काही दिवसांमध्ये रुग्ण कमी झाले आहेत. तरी देखील आम्ही कोरोनाची नियम पाळत किमान तीन तासांचे साहित्य संमेलन भरविणार आहे. तेंव्हा आम्हाला सहकार्य करावे, असे निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकाऱयांनी निवेदन स्वीकारुन याबाबत विचारविनीमय करुन तुम्हाला साहित्य संमेलन भरविण्यास परवानगी देवू, असे आश्वासन दिले.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष ऍड. नागेश सातेरी, कार्याध्यक्ष गुणवंत पाटील, लक्ष्मण होनगेकर, निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे, ऍड. सुधीर चव्हाण, बी. जी. गौंडाडकर, कृष्णा शहापूरकर, सुहास हुद्दार, शिवाजी शिंदे यांच्यासह साहित्य संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.