बेंगळूर : राज्यात विविध समुदाय आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. मात्र, कायद्याच्या चौकटीत राहूनच आरक्षणाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिले. दावणगेरे येथे पत्रकारांशी ते बोलत होते. वीरशैव-लिंगायत, वाल्मिकी, कुरुब समुदाय आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. त्यामुळे आंदोलनात सहभागी असलेल्या सर्व समुदायातील स्वामीजींनी कोणतीही भीती बाळगू नये. राज्य सरकार तुमच्या सोबत आहे. घटनेच्या चौकटीत राहूनच आरक्षण मिळवून देण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील. विविध समुदायातील स्वामीजी करत असलेले आंदोलन योग्य दिशेने सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाचा सन्मान करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. लवकरच मंत्रिमंडळात आरक्षणाबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Previous Articleकोप्पळ येथे 151 व्या प्रयत्नात कूपनलिकेला लागले पाणी
Next Article राज्यातील निजद नेत्यांमध्ये एकतेचा अभाव
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.