पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती : गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
गणेशोत्सवासाठी जिल्हय़ाबाहेरून येणाऱया लोकांना ‘आरटीपीसीआर’ टेस्ट सक्तीची केलेली नाही. मात्र गणेशोत्सव साजरा करताना गर्दी करू नका. कोरोनाच्या तिसऱया लाटेला सामोरे जावे लागू नये, यासाठी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हावासीयांना केले आहे.
गणेशोत्सवासाठी जिल्हय़ाबाहेरून येणाऱया लोकांना आरटीपीसीआरची सक्ती करू नका, आशा सूचना दिल्या आहेत. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना आणि 18 वर्षांखालील मुलांना कोणतेही निर्बंध नसून त्यांना जिल्हय़ात थेट प्रवेश मिळणार आहे. इतर नागरिकांनी आरटीपीसीआर टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवला, तर चांगलेच आहे. परंतु आरटीपीसीआर करून येणे सक्तीचे केलेले नाही. त्यांनी आल्यावर रॅपिड टेस्ट करून घ्यावी. गरज पडली, तर आशा सेविकांना घरोघरी पाठवून सर्व्हे केला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
गणेशोत्सवात भजने, फुगडय़ा यांच्यावर निर्बंध नाहीत. परंतु कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेचा धोका लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनाने गर्दी टाळून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा व तिसऱया लाटेला सामोरे जावे लागू नये, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. त्याप्रमाणे सर्वांनी कोविडच्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
त्या कर्मचाऱयांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी प्रस्ताव
कोविड काळात घेण्यात आलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱयांना कमी केले असले, तरी त्यांना पुन्हा आरोग्य सेवेत घेण्यासाठी आपण कॅबिनेट मंत्रिमंडळात मुद्दा मांडला असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्याला सकारात्मकता दाखविली आहे. त्यामुळे लवकरच हा प्रश्न सुटेल, असे पालकमंत्री म्हणाले.
आरटीपीसीआर सक्तीची नाही, मात्र रॅपिड टेस्ट करा – जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, जिल्हय़ाबाहेरून प्रवेश करण्?याकरिता कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन मात्रा पूर्ण असाव्यात. मात्र, ज्या नागरिकांच्या दोन मात्रा पूर्ण झालेल्या नाहीत, अशा नागरिकांना जिल्हय़ात प्रवेशापूर्वी 72 तास पूर्वीचा आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे. ज्या प्रवाशांकडे कोरोना लसीच्या दोन मात्रा पूर्ण झालेले प्रमाणपत्र किंवा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल नसेल, अशा प्रवाशांची मोफत रॅपिड टेस्ट केली जाईल. 18 वर्षांखालील मुलांचे लसीकरण होत नसल्याने त्यांच्या प्रवेशास आरटीपीसीआर चाचणी अहवाल आवश्यक नाही.
अशा आहेत मार्गदर्शक सूचना
जिल्हय़ाबाहेरून येणाऱया नागरिकांची महसूल, आरोग्य व पोलीस पथकामार्फत जिल्हय़ात प्रवेशाच्या ठिकाणी चेक पोस्टवर, रेल्वे स्टेशन व बसस्?थानकावर नोंदणी करण्यात यावी. मुंबई, पुणे किंवा जिल्हय़ाबाहेरून एस. टी. बसमधून येणाऱया प्रवाशांची माहिती, बस ज्या ठिकाणाहून सुटेल, त्याच ठिकाणी विहित नमुन्यामध्ये दोन प्रतीत भरावी. त्याची एक प्रत जिल्हय़ात प्रवेशाच्या ठिकाणी चेकपोस्टवर जमा करून घ्यावी. सदर माहितीची दुसरी प्रत वाहन चालक यांनी तालुक्मयाच्या एसटी डेपोमध्ये जमा करावी. एसटी विभागाने सदर माहिती संकलित करण्याकरिता नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी सदर माहिती संबंधित तहसील कार्यालयात रोजच्या रोज सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमा करावी.
मास्क, सॅनिटायझर अत्यावश्यक
खासगी किंवा एसटी बस चालक, वाहकांनी कोविड चाचणी अगोदरच केलेली असणे आवश्यक असेल. तसे न केल्यास बस पोहोचण्याच्या ठिकाणावर चाचणी करावी. खासगी किंवा एसटीतील प्रवाशांनी मास्क, सॅनिटायझरचा व्यवस्थित वापर करणे अनिवार्य असल्याची समज वाहन, चालक यांनी द्यावी. उपप्रादेशिक परिवहन विभाग, जिल्हा पोलीस प्रशासन, हायवे पोलीस प्रशासन यांनी चेकपोस्टवर संयुक्तरित्या खासगी बसेस, मिनी बसेस तपासणी करावी, असेही मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.
रेल्वेमार्गे येणाऱया प्रवाशांची नोंद
खासगी बसच्या वाहन चालकांनी खासगी बसेसमधून आलेल्या प्रवाशांच्या माहितीची एक प्रत चेक पोस्?टवर जमा करावी व एक प्रत संबंधित तहसील कार्यालयात रोजच्या रोज सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यामार्फत जमा करावी. तहसीलदारांनी एसटी बसेस व खासगी बसेसमधून आलेल्या प्रवाशांची यादी ग्राम नियंत्रण समितीकडे पाठवावी. चेकपोस्टवर कार्यरत कर्मचाऱयांनी लहान खासगी वाहनांच्या चालकाकडून गाडी नंबर आणि प्रवासी संख्या व एका प्रमुख व्यक्तीचा मोबाईल क्रमांक, नाव व पत्ता याची माहिती घ्यावी. रेल्वेमार्गे येणाऱया प्रवाशांची यादी संबंधित उपविभागीय अधिकारी (महसूल) यांनी रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त करून घ्यावी. रेल्वेमार्गे येणाऱया नागरिकांची नोंद करून घेण्?याकरिता पथके नियुक्त करावीत. अशा सूचना देण्यात आल्या असून या सर्व कामासाठी नियंत्रण ठेवण्याकरिता नोडल अधिकारी म्हणून वर्षा शिंगण यांची नेमणूक करण्यात आली आहे.
प्रवाशांची यादी घेऊन नियोजन करावे
गणेशोत्सवाकरिता नगर पालिका, नगर पंचायत क्षेत्रात येणाऱया प्रवाशांची यादी संबंधित मुख्याधिकाऱयांनी तहसीलदारांकडून रोज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त करून घेऊन त्याबाबत नियोजन करावे. प्रवाशांच्या याद्या ग्राम नियंत्रण समितीकडे प्राप्त झाल्यानंतर संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षकांनी त्यांच्या यंत्रणेमार्फत त्याच दिवशी दोन डोस न घेतलेले व 72 तासापूर्वी कोरोना चाचणी अहवाल न आणणाऱया जिल्हय़ाबाहेरून आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याचे सूक्ष्म नियोजन करावे. चाचणीमध्ये बाधित आढळणाऱया किंवा लक्षणे दिसणाऱया व्यक्तींना तात्पुरत्या संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात यावे. तात्पुरत्या संस्थात्मक विलगीकरणासाठी संबंधित गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि तहसीलदार यांनी ग्रामस्तरावर इमारतीचे नियोजन करावे. यामध्ये ग्रामस्थांच्या सहभागाने केंद्र निश्चित करावे. तद्नंतर आवश्यकता भासल्यास त्यांना नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये हलविण्यात यावे.
विलगीकरणास विरोध करणाऱयांवर कारवाई
तात्पुरत्या संस्थात्मक विलगीकरणाच्या ठिकाणी स्थानिक प्रशासनामार्फत पाणी, वीज व वैद्यकीय सुविधा पुरविण्यात याव्या. कोरोना चाचणीस व कोरोना बाधित व्यक्तीच्या विलगीकरणास विरोध करणाऱया व्यक्तींवर पोलिसांमार्फत कारवाई करण्यात यावी. ग्राम नियंत्रण समितीने आपल्या कार्यक्षेत्रामध्ये गर्दी होणार नाही व कोविडच्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घ्यावी. गावातील, शहरातील दुकानदार, भाजी, फळ, फुले विपेते व ग्राहक यांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्?क न वापरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.