प्रतिनिधी / बेळगाव
येथील एसकेई संस्थेच्या राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाच्या एनएसएस आणि विद्यार्थी कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कॉलेजच्या पद्मश्री पु. ल. देशपांडे खुल्या रंगमंचावर साजरी करण्यात आली. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. विजयकुमार पाटील यांनी केले.
प्राचार्या डॉ. शोभा नाईक यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच प्रा. एस. एस. शिंदे, एनएसएस प्रमुख रामकृष्ण एन., आयक्मयूएसी चेअरमन डॉ. अभय पाटील, प्रा. एस. एच. पाटील, डॉ. एम. एस. कुरणी, प्रा. प्रसन्ना जोशी, प्रा. पूजा पाटील, प्रा. इंदिरा होळकर, अधीक्षक चिकमठ, गंगाधर देशपांडे व विद्यार्थ्यांनी सुद्धा डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
याप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. शोभा नाईक यांनी, भारतीय राज्यघटना ही संपूर्ण जगामध्ये लोकहितकारी आहे. डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधीजी, महर्षि कर्वे, डॉ. राजाराम मोहनराय यांच्या समाज सुधारणेमुळेच देशातील सर्वसामान्य स्त्री-पुरुष शिक्षित होऊ शकले. प्रत्येक शिक्षकाने आपल्या परिने देशासाठी, समाजासाठी योगदान दिले पाहिजे, असे सांगितले. एन. रामकृष्ण यांनी उपस्थितांचे आभार मानले.