चित्र विदारक, पण सुधारणा शक्मय : बिम्स कारभाराबद्दल तीव्र नाराजी – संतप्त प्रतिक्रिया : समन्वय नसल्याने गोंधळजन्य परिस्थिती
मनीषा सुभेदार / बेळगाव
यंत्रणा ढासळली की बोजवारा उडणे हे क्रमप्राप्त आहे. बेळगावमध्ये सध्या कोविड परिस्थितीबाबत नेमके हेच झाले आहे. यंत्रणा भक्कम करण्यासाठी तिच्याशी निगडीत सर्व घटकांमध्ये परस्पर सहकार्याची व समन्वयाची भावना असणे महत्त्वाचे. नेमका तिचा अभाव सध्या बेळगावमध्ये दिसतो आहे. त्यामुळे यंत्रणेच्या त्रुटींमध्ये सर्वसामान्य रुग्ण भरडले जात आहेत.
रुग्ण दाखल करून घेण्यास बिम्स असमर्थता दर्शविते. बेड्स नाहीत, व्हेंटिलेटर नाहीत हे बिम्स प्रशासनाचे ठरलेले उत्तर आहे. खासगी हॉस्पिटल्समध्ये प्रथम आगाऊ रक्कम (ऍडव्हान्स) भरण्यास सांगितले जाते. पुन्हा बिलाबाबत रुग्णाच्या नातेवाईकांच्या डोक्मयावर अनिश्चिततेची तलवार असतेच. ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिवीरची गरज यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक अनेक हॉस्पिटल्सच्या पायऱया झिजवतात. परंतु अपवाद वगळता त्यांची दखल घेतली जातेच असे नाही. खासगी हॉस्पिटल्स रुग्णांची लूट करत आहेत, असा मतप्रवाह बऱयाच ठिकाणी दिसून आला. तो दूर करणे ही आयएमएची जबाबदारी असणार आहे.
बिम्स कारभाराबद्दल अत्यंत नाराजी व संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. रुग्णांच्या सहनशिलतेचा अंत येथे पाहिला जातो. नेमके चित्र स्पष्ट न केल्याने गोंधळ अधिकच वाढतो आहे. परंतु तो कमी करून यंत्रणा सुधारावी, अशी कळकळ कोठेच दिसत नाही. रुग्ण बिम्सवर टीका करतात, बिम्स रुग्णांच्या वर्तनाकडे बोट दाखविते. खासगी हॉस्पिटल्सचे दर रुग्णाला परवडत नाहीत. आयुष्मान भारत (एबीआरके) लागू करण्यासाठी हॉस्पिटल्स तयार नाहीत. कारण त्यांचे मागचे बिलच अजून आलेले नाही.
हा सर्व गोंधळ निश्चितच कमी करता येतो. कोविड परिस्थितीमध्ये सध्या जिल्हा प्रशासन, आरोग्य खाते, महानगरपालिका, आयएमए, बिम्स, सामाजिक कार्यकर्ते किंवा संघटना यांच्यातील समन्वय खूप महत्त्वाचा आहे. तो नसल्याने गोंधळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून प्रत्येक जण दुसऱयाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकतो आहे.
या असमन्वयाचा जबरदस्त फटका रुग्णांना बसत असून त्याच्या दृष्टीने कोण विचार करणार हा प्रश्न आहे. सदर प्रतिनिधीने या सर्व संस्थांच्या प्रमुख अधिकाऱयांशी आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. चित्र विदारक असेच आहे. परंतु ते निश्चितपणे सुधारता येऊ शकते, ही आशाही आहे.
बिम्सची मोठी समस्या
अलीकडे बिम्सकडे कोणत्याहीबाबत चौकशी करता जिल्हाधिकाऱयांना विचारा, असे उत्तर येते. सामान्य रुग्ण त्यांच्याशी संपर्क साधण्याचे धाडस करूच शकत नाही. तेथेच तो गर्भगळीत होतो व त्याची फरफट सुरू होते. एकूण चित्र लक्षात घेता बिम्सचा कारभार लवकर सुधारणे आवश्यक आहे. मुळात रुग्णसंख्या अधिक व स्टाफ कमी ही बिम्सची मोठी समस्या आहे. ती दूर करणे आवश्यक आहे. कंत्राटी कर्मचारी व नर्स राबत आहेत. पण कायमस्वरुपी असणारे गलेलठ्ठ पगार घेणारे रुग्णांकडे फिरकतही नाहीत, हे कटू असले तरी सत्य आहे. 100 रुग्णांमागे फक्त दोन नर्स सेवेत असतील तर त्यांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेची किती परीक्षा घेतली जाते, याचा अंदाज येऊ शकतो.
रुग्ण डॉक्टरांना देव समजतात. पण डॉक्टर रुग्णाला भक्त म्हणून कधी तरी पाहणार आहेत का? रुग्णांवर खेकसणे, त्यांच्या नातेवाईकांवर आवाज चढविणे, बेचव अन्न देणे, स्वच्छतेचा पूर्ण अभाव असणे हे चित्र सरकारी व खासगी हॉस्पिटल्स या दोन्ही ठिकाणी आहे. या त्रुटी जितक्मया लवकर दूर होतील तितक्मया लवकर बिम्स अधिक सक्रिय होऊ शकेल व कदाचित कोरोनासुद्धा नियंत्रणात येऊ शकेल. ज्यांच्याशी संवाद साधला त्यांनी आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत. याचा साधक-बाधक विचार प्रत्येक घटकांनी केल्यास यंत्रणा सुरळीतपणे व सक्षमपणे कार्यरत होऊ शकते.
सर्वांमध्ये एकसूत्रता आल्यास परिस्थितीत निश्चितपणे बदल
आरोग्य सेवेसंदर्भातील सर्व मुद्दय़ांबाबत जिल्हाधिकाऱयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. प्रत्येक घटक आपल्यापरीने काम करतो आहे, हे कोणीच नाकारत नाही. परंतु रुग्णाची तातडीने घेतली गेलेली दखल, आवाक्मयात असणारे बिल, सोयी सुविधा, योजनेची अंमलबजावणी या सर्वांमध्ये एकसूत्रता आल्यास परिस्थिती निश्चितपणे बदलू शकते.
185 रुग्णांना आयुष्मान भारतचा लाभ
प्रशासनाने सध्या 17 हॉस्पिटल्सना कोविड हॉस्पिटल म्हणून जाहीर केले आहे. त्यांच्याकडे असणाऱया बेड्सपैकी 50 टक्के बेड त्यांनी कोविड विभाग म्हणून आरक्षित ठेवले पाहिजेत. आजपर्यंत 185 रुग्णांना आयुष्मान भारतचा लाभ झाला आहे.
आमच्यापरीने सर्व ते प्रयत्न : डॉ. विनय दास्तीकोप-वैद्यकीय संचालक, बिम्स
बिम्सची कोविड रुग्ण घेण्याची क्षमता 350 बेड्सची आहे. बिम्सचा स्वतःचा ऑक्सिजन प्लान्ट आहे. सध्या ओपीडी सुरू आहे. रुग्ण वाढल्याने अधिक बेड्स वाढविले आहेत. परंतु अशी परिस्थिती उद्भवेल याची आम्हालाही कल्पना नव्हती. आम्ही आमच्यापरीने सर्व ते प्रयत्न करत
आहोत.
दामदुप्पट दर आकारण्याला नेहमीच विरोध : डॉ. अनिल पाटील-अध्यक्ष, आयएमए
सरकारने खासगी हॉस्पिटल्सना दर निश्चित करून दिले आहेत. परंतु औषधांचे दर चौपट वाढलेत हे सरकारच्या लक्षात येत नाही. एका इंजेक्शनची किंमत रुपये 60 वरून 350 रुपये झाली आहे. काही हॉस्पिटल्स दाम दुप्पट बिल आकारत आहेत. त्याचा आयएमए अध्यक्ष म्हणून मी निषेधच करतो. परंतु जी हॉस्पिटल्स नियमांनी चालत आहेत त्याबद्दल कोणीच बोलत नाही. सरकारने दर ठरवून दिले आहेत. जी हॉस्पिटल्स असा दर आकारत आहेत त्यांचा परवाना (लायसन्स) आरोग्य खात्याने तपासणे आवश्यक आहे. ऑक्सिजन बेड असेल तर 25 हजार हा दर आहे. त्यामध्ये खोली, सुश्रुषा याचा अंतर्भाव आहे.
खासगी हॉस्पिटल्सनी लावलेले दाम दुप्पट बिल पाहून आपण सर्व हॉस्पिटल्सच्या प्रमुख डॉक्टरांची मीटिंग घेऊन सरकारने ठरविलेले दर आकारा, अशी सूचना दिली आहे. ज्या हॉस्पिटल्सच्या तक्रारी आहेत त्यांच्या वैधतेची तपासणी त्वरेने केली जावी. हॉस्पिटल्सनी दर्शनी भागात दरपत्रक लावावेत, अशीही सूचना आम्ही केली आहे. आज 17 हॉस्पिटल्सना आयुष्मान योजना सक्तीची केली आहे. ती सर्व हॉस्पिटल्सना करावी, अशी आमची मागणी आहे.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे आयएमए, महानगरपालिका आणि रेडक्रॉस यांच्या साहाय्याने कोल्हापूर सर्कलला मोफत ऑक्सिजन बँक सुरू करण्यात आली आहे. तेथे 20 रुग्ण दाखल करण्याची क्षमता आहे आणि ऑक्सिजन बसमध्ये दहा रुग्णांना ठेवता येते. येथे त्यांची ऑक्सिजन पातळी तपासली जाते. त्यासाठी रेडक्रॉसचे स्वयंसेवक, आयएमएचे डॉक्टर कार्यरत आहेत. ज्यांची प्रकृती गंभीर होते त्यांना बिम्स किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये पाठविले जाते. मात्र, दामदुप्पट दर आकारण्याला आयएमएचा नेहमीच विरोध आहे. परंतु प्रशासनाने डॉक्टरांची बाजू समजून घ्यायला हवी. औषधे, तपासण्या, स्टाफचा पगार व अन्य खर्च यांचाही ताळमेळ कुठे तरी घातला
जावा.
मनुष्यबळ वाढविणे ही बिम्सची गरज :डॉ. कुलगोड-संचालक लेकक्हय़ू हॉस्पिटल
प्रशासनाने ठरवून दिलेले दर आकारण्यास काहीच हरकत नाही. त्याला आमची तयारी आहे. परंतु हे दर ठरविताना औषधांचे वाढलेले दर व स्पेशलायझेशन (तज्ञ डॉक्टर) हे लक्षात घेतले गेले नाही. आयुष्मान लागू करण्यास काहीच हरकत नाही. परंतु अद्याप मागच्या वेळच्या बिलाचे पैसे मिळालेले नाहीत. त्यावर सरकारचे किंवा प्रशासनाचे काय उत्तर आहे?
बिम्सचा कारभार सुधारण्यासाठी सदैव काम करणाऱया नर्स आणि कर्मचाऱयांना त्यांच्या पगाराशिवाय वाढीव मानधन देऊन त्यांचे मनोबल वाढविणे आवश्यक आहे. त्यांची परिस्थिती भयावह आहे. अनेक सामाजिक संस्था विविध स्वरुपात मदत करत आहेत. या संस्थांनी या हॉस्पिटल्समधील कंत्राटी नर्स आणि कर्मचारी यांना मानधन द्यावे, असे मला वाटते. मनुष्यबळ वाढविणे ही बिम्सची प्राथमिक गरज असली पाहिजे. या दोन मुद्दय़ांकडे लक्ष दिल्यास तेथील कारभार निश्चित सुधारू शकतो.
सरकारचे दर परवडणारे नाहीत :डॉ. रवी पाटील-विजया ऑर्थो
सरकारचे दर परवडणारे नाहीत, हे उघड आहे. कोविड हॉस्पिटल केले तरी कोणतेही अन्य खर्च थांबत नाहीत. आज माझे चार डॉक्टर पॉझिटिव्ह आहेत. त्यांचा पगार आणि उपचार याची जबाबदारी माझ्यावर आहे. सरकारी हॉस्पिटल्सना इमारतीचा व औषधांचा खर्च नसतो. आम्हाला सरकारने ऑक्सिजन सिलिंडर्स, काही नर्सिंग स्टाफ सपोर्ट सिस्टीम म्हणून पुरवावा, आम्हाला काही मदत मिळाली तर आम्हालाही रुग्णांना काही अंशी मदत करता येते.
मनपातर्फे तीन सरकारी कोविड सेंटर :डॉ.संजीव डुमगोळ-आरोग्याधिकारी, मनपा
महानगरपालिका प्रत्यक्ष उपचार पद्धतीत सक्रिय नसली तरी संरचना (इन्फ्रास्ट्रक्चर) उभे करणे हे आमचे काम आहे. आज मनपातर्फे तीन सरकारी कोविड केअर सेंटर सुरू आहेत. देवराज अर्स कॉलनी, सुभाषनगर, कुमारस्वामी लेआऊट व संगमेश्वरनगर येथे ही सेंटर्स आहेत. आरोग्य खात्याचे डॉक्टर येथे कार्यरत आहेत. मात्र, रुग्णांची भोजन व्यवस्था मनपा पाहते. या शिवाय मृत्यूची संख्या वाढू लागल्याने पालिकेने वडगाव, खासबाग, अनगोळ येथील स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची सोय केली आहे. या स्मशानभूमी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत सुरू आहेत. सदाशिवनगर स्मशानभूमी 24 तास सुरू
असते.
रुग्णांनी तक्रार करावी :डॉ. मुन्याळ-जिल्हा आरोग्याधिकारी
सरकारने खासगी हॉस्पिटल्सना दर ठरवून दिले आहेत. या संदर्भात बोलाविलेल्या बैठकीला ज्या हॉस्पिटल्सचे प्रतिनिधी हजर नव्हते, त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. आयुष्मान भारत योजना लागू करण्याची सूचनाही केली आहे. मात्र, त्याबाबत जर कार्यवाही होत नसेल तर रुग्णांनी निश्चितपणे तक्रार करावी.
बिम्सचे प्रशासन पूर्णतः कोलमडलेले :मदन बामणे-सामाजिक कार्यकर्ते
बिम्सचे प्रशासन पूर्णतः कोलमडले आहे. बेड्स असून ते नाहीत असे सांगितले जाते. काही विचारल्यास डीसींना विचारा, असे उद्धट उत्तर मिळते. केव्हाही रुग्णांना घेऊन गेल्यास बेड नाहीत हे उत्तर ठरलेले. मी स्वतः मध्यरात्री 3 रुग्णांना घेऊन गेलो. डिस्चार्ज झाल्याने व दोन रुग्ण मृत झाल्याने त्यांचे बेड्स रिकामी होते. परंतु आम्हाला आत प्रवेश करू दिला गेला नाही. जर वरि÷ पातळीवरून सूचना आली तरच रुग्णांना दाखल करून घेतले जाते. डिलीव्हरी वॉर्डमध्ये ऑक्सिजन उपलब्ध नाही. परंतु तिथे सोय करता येऊ शकते. मी स्वतःच तेथे आठ जणांना दाखल केले आहे. एकूणच बिम्सचा अनुभव हा अत्यंत वेदनादायी आणि कटू असा आहे. आपण जिल्हाधिकाऱयांशीसुद्धा बोललो असून परिस्थिती सुधारेल, असे त्यांनी सांगितले.
रुग्ण आणि नातेवाईकांचा वाईट अनुभव : संतोष दरेकर-सामाजिक कार्यकर्ता
बिम्सचा कारभार समाधानकारक नाही. डॉक्टर आणि नर्स याबद्दल मी फारसे बोलणार नाही. परंतु रुग्णांना दिले जाणारे जेवण काही अंशी बरे आहे. परंतु नातेवाईकांना मिळणारे जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. कॅन्टीनमध्ये स्वच्छतेचा पूर्ण अभाव आहे.
गंभीर रुग्णाला घेऊन गेलो तरी आधी आधारकार्ड दाखवा, पावती करा, मग डॉक्टर येतील, असे सांगितले जाते. पण कोणीच आधी रुग्ण दाखल करा, त्याच्यावर उपचार सुरू करू, असे म्हणत नाही. हा बहुसंख्य रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा अनुभव आहे.