प्रतिनिधी / पंढरपूर
यंदाच्या वर्षीचा आषाढी वारी पालखीसोहळा हा निघणारच आहे. परंपरा खंडीत होणार नाही. मात्र सदरचा पालखी सोहळा प्रस्थान करीत असताना आवश्यक त्या ठिकानी मार्ग बदलून मोठ्या डामडौलात पंढरपूरी जाईल. यामध्ये अंत्यत कमी माणसांचा समावेश असेल.तसेच सातही प्रमुख पालखीसोहळ्याबाबत एक प्रोजेक्ट तयार करण्यात येईल. याबाबत शासनाशी एक समन्वय समिती चर्चा करेल. असा निर्णय आजच्या वारकरी पालखीसोहळा समन्वय समितीच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत झाला.
आज सकाळी 9 वाजता सर्व प्रमुख संतांच्या पालखी सोहळा समन्वयकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये पंढरपूर येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख मानकरी ह.भ.प. राणा महाराज वासकर सहभागी झाले होते.
सध्या अनेक पालख्यांचे मार्ग हे कोरोनाच्या रेड झोन मधून जातात. यामध्ये माऊलीचा पालखीसोहळा थेट पुणे येथून न जाता. सासवड येथून पंढरपूरकडे न्यावा. असे मार्ग यावर्षीसाठी योग्य ठरू शकतात. असेच प्रयोजन इतर पालखीसोहळ्याबाबत केले पाहीजे. तसेच एखाद्या पालखी सोहळ्याला जर ठराविक व्यक्तींची परवानगी मिळाली. तर संबंधित परवानगी ही सर्वच पालखीसोहळ्याला लागू असेल. तसेच प्रत्येक पालखी सोहळ्यासोबत एक वैद्यकीय पथक देखिल असणार आहे. यामध्ये संपूर्ण पायी पालखी सोहळा हा सोशल डिस्टन्स पालन करून केला जाणार आहे.
या सर्व बाबींचया अनुषंगागे यापुढच्या काळात एक समन्वय समिती सरकारशी चर्चा करेल. आणि सरकारी सूचनांचा विचार करुनच पुढील निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे सदरच्या बैठकीत ठरविण्यात आले आहे.
यंदाच्या आषाढीला प्रमुख संतांचे पालखी सोहळे निघणार की नाही. याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. याबाबतच सर्व प्रमुख सातही पालखी सोहळा समन्वयक यांची बैठक संपन्न झाली. त्यामुळे यंदाच्या वर्षी संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम ,संत मुक्ताई, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, असे सर्व पालखी सोहळा त्यांच्या नियोजित प्रस्थानाच्या दिवशीच पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत.