प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव, हुबळी व कारवार जिल्हय़ात पंढरपूरच्या विठ्ठलाचे अनेक भक्त आहेत. दरवषी आषाढीला या परिसरातून शेकडो भाविक पायी, खासगी वाहनांनी, रेल्वेने मार्गस्थ होतात. पंढरपूरच्या भक्तांसाठी नैर्त्रुत्य रेल्वेकडून विशेष रेल्वेही सोडण्यात येते. परंतु मागील वषीप्रमाणेतच यावषीही आषाढीची वारी रद्द करण्यात आली आहे. यामुळे रेल्वेला यावषीही आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.
शेतीची कामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱयांना आस लागते ती विठुरायाच्या दर्शनाची. बेळगाव परिसरातून दरवषी हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. बेळगावमधून पंढरपूरला जाणाऱया भाविकांची संख्या अधिक असल्याने नैर्त्रुत्य रेल्वे विभागाने दोन थेट रेल्वे सोडल्या होत्या. दुपारी 2.30 वा. बेळगाव ते पंढरपूर तर चारच्या सुमारास हुबळी-पंढरपूर या मार्गावर रेल्वे सुरू होत्या. यामुळे दररोज पंढरपूरला जाणाऱयांना या रेल्वे सोयीच्या ठरत होत्या. याखेरीज आषाढी व कार्तिकीच्या काळात विशेष यात्रा रेल्वे सोडण्यात येत होत्या.
मागील वषी कोरोनामुळे आषाढी यात्रा रद्द करण्यात आली होती. काही वारकऱयांच्या उपस्थितीत ही यात्रा झाली. यामुळे रेल्वे विभागाला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते. मागील वषीप्रमाणेच यावषीही आषाढी यात्रा महाराष्ट्र सरकारने रद्द केली आहे. यामुळे वारकऱयांना यावषीही विठुरायाच्या दर्शनासाठी जाता येणार नाही. त्यामुळे रेल्वेला पुन्हा नुकसान सोसावे लागणार आहे.
दरवषी विशेष रेल्वेची करण्यात येत होती सोय
बेळगावमधून दररोज दोन रेल्वे पंढरपूरला जात होत्या. परंतु तरीही भाविकांची संख्या अधिक असल्याने सिटीझन्स फोरमच्या माध्यमातून विशेष रेल्वे सोडण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीमुळेच मागील काही वर्षांत विशेष रेल्वे सोडण्यात आली होती. आठवडाभर विशेष रेल्वे सोडल्याने प्रवाशांची सोय होत होती.