गुवाहाटी / वृत्तसंस्था
आसाममध्ये काँगेसला पुन्हा एक धक्का बसला आहे. या पक्षाचे नेते जुरी शर्मा बोरडोलोई हे भाजपमध्ये आलेले आहेत. 18 जूनला त्यांनी काँगेस पक्षाचा त्याग केला. त्याचवेळी या पक्षाच्या विद्यमान आमदार रूपज्योती कुरमी यांनीही आमदारकीचा त्याग करून पक्षालाही सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर कुरमी यांनी 21 जूनला भाजपमध्ये प्रवेश केला. त्या चार वेळा आमदार होत्या. त्यानंतर आता काँगेसला शर्मा यांच्या जाण्याने दुसरा धक्का बसला आहे. काँगेस पक्ष केवळ लोकांची दिशाभूल करण्यावर भर देतो, असा आरोप शर्मा यांनी केला.