आतापर्यंत राज्यात 190 हून अधिक जणांचा मृत्यू
गुवाहाटी / वृत्तसंस्था
आसाममध्ये पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत 190 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील 11 जिल्हे अजूनही महापुरात बुडाले आहेत. 9 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. गेल्या 24 तासांत एका बालकासह तिघांचा मृत्यू झाला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, बजली, कचार, चिरांग, दिब्रुगढ, हैलाकांडी, कामरूप, करीमगंज, मोरीगाव, नागाव, शिवसागर आणि तामुलपूर जिह्यात हजारो लोकांना पुराचा फटका बसला आहे. कचर जिह्यात सर्वात भीषण परिस्थिती आहे. 10 जिह्यांमध्ये 173 निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये 75,185 लोकांनी आश्रय घेतला आहे.
आसामप्रमाणेच देशाच्या इतर भागातही दमदार पाऊस सुरू आहे. राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. पुढील दोन ते तीन दिवस 12 जिह्यांत मध्यम आणि 2 जिह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोटा विभागात मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे.
तेलंगणा, उत्तर किनारपट्टी आंध्रप्रदेश, दक्षिण छत्तिसगड, दक्षिण ओडिशा, दक्षिण मध्यप्रदेशचा काही भाग, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि गोवा, दक्षिण गुजरात आणि कर्नाटक किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, केरळ आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्मयता आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्ली आणि उत्तर राजस्थानमध्ये तुरळक पावसाचा अंदाज आहे.