फार फार पूर्वी आपल्याकडे सगळे आलबेल होते, घरोघरी सोन्याचा धूर निघत होता आणि मधल्या काळात पाश्चात्यांनी आपले धन आणि ज्ञान लुटून नेले असे आपण पूर्वीपासून ऐकत आलो.
लॉकडाऊनच्या काळात आपण सगळे घरातच कोंडले गेलो होतो. या काळात निखळ जिज्ञासा म्हणून मी इतिहासावरच्या काही पुस्तकांची मराठी भाषांतरे केली. मध्ययुगीन भारतावरच्या एका पुस्तकातले काही तपशील चक्रावून टाकणारे आणि रंजक वाटले. कागद, बंदुकीची दारू, होकायंत्र, ढकलगाडी, घोडागाडी आणि बहुधा खाणकामासाठी उत्खननाचे तंत्रज्ञान, फौंड्री, झुलता पूल (सस्पेन्शन ब्रिज), वगैरेच्या प्रक्रिया चीनमधून पोचल्या. भारत आणि इराणमधील पाणचक्की, वस्त्रमाग (स्पिनिंग व्हील), पवनचक्की वगैरे शोध युरोपपर्यंत कसे पोचले हे आपल्याला पुरेसे ज्ञात नाही. सर्वसाधारण समज आहे त्यापेक्षा जुने जग – भूमध्य समुद्र ते भारत आणि मध्य आशिया ते चीन अधिक एकसंध होते. पूर्व आफ्रिकेच्या किनाऱयाच्या वरच्या पट्टय़ातील आणि आग्नेय आशियातील प्रदेश सागरी व्यापारवृद्धीमुळे एकमेकांशी जोडले गेले होते. पाचव्या ते बाराव्या शतकात दक्षिण भारत आणि आग्नेय आशियातील देशांमध्ये बौद्ध आणि हिंदू संकल्पनांची देवाणघेवाण झाली, सांस्कृतिक-आर्थिक संबंध जुळले. समुद्र पर्यटनाचे, भूगोलाचे, जहाज बांधणीचे ज्ञान आणि सागरावरील मुशाफिरीच्या धाडसाखेरीज हा विस्तार शक्मय नव्हता हे उघड आहे. मात्र पाश्चात्यांचे इतिहास लेखन अजूनही पोर्तुगालचा राजपुत्र दर्यावर्दी प्रिन्स द नेव्हिगेटरच्या पलीकडे बघत नाही की भारतीयांना आणि आशियाईंना योग्य श्रेय देत नाही. उत्तर आणि दक्षिण भारताचे मेसोपोटेमिया आणि इजिप्तशी ख्रिस्तपूर्व तिसऱया शतकापासून व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध होते. अनेक असिरीयन दंतकथाना (प्रलय, गिलगमेश, इ.) भारतीय पौराणिक कथांमध्ये स्थान मिळाले. असिरीयन विज्ञान, विशेषतः खगोलशास्त्र आणि गणित यांचे प्राचीन भारतातील विज्ञानाच्या विकासाशी जवळचे नाते आहे. खेरीज, नंतरच्या काळातही बौद्ध आणि हिंदू संकल्पना भूमध्य सागरपट्टय़ात कशा पोचल्या, त्यांचे धागेदोरे ग्रीक निओप्लेटोनिझमपर्यंत आणि शिवाय ख्रिस्ती मोनास्टिसिझम किंवा मोंकहूड आणि इस्लामी गूढवादापर्यंत कसे पोचले हे आपल्याला ठाऊक नाही.
हे सगळे वाचताना अरेबियन नाईट्स आणि कथासरित्सागर यांच्यातील कथांमधल्या साम्यस्थळांचा उलगडा होतो. मात्र रामायणातली लंकेवरची स्वारी आणि अरेबियन नाईट्समधील सिंदबादच्या सात सफरींचा अपवाद सोडला तर आपल्या साहित्यात सागरी सफरींचे, लढायांचे उल्लेख का नाहीत हे कोडे तसेच राहते.
महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात-
आपल्या शयनकक्षात आपल्या मंचकाजवळ एक अपरिचित युवती पाहून अनिरुद्धाला आश्चर्य वाटले. त्याने चित्रलेखेला विचारले की तू कोण व इथे कशासाठी आलीस. चित्रलेखेने सर्व वृत्तांत कथन केला व म्हणाली-स्वामी! आपण आता माझ्यासोबत उषेकडे त्वरित चला. आपण उशीर केलात तर उषा आपला प्राण सोडील. तिचा जीव वाचवणे केवळ आपल्या हातात आहे. मागील द्वादशीच्या रात्री काय घडले होते याचे स्मरण अनिरुद्धाला तिने करून दिले. अनिरुद्धही उषेला प्रत्यक्ष भेटायला उत्सुक होता. पण ती बाणासुराची कन्या आहे आणि ही काही राक्षसी माया असेल तर? असा विचार करून तो म्हणाला-मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे. पण तत्पूर्वी मला बलरामदादा, भगवान श्रीकृष्ण व माझे बाबा प्रद्युम्न यांच्या कानावर ही गोष्ट घालून त्यांची अनुज्ञा घ्यावी लागेल. या सर्व गोष्टींना बराच विलंब लागेल हे चित्रलेखेच्या लगेच लक्षात आले. तिने क्षणाचाही विलंब न करता आपल्या योगिक सामर्थ्याने तामसी विद्येचा वापर करून अनिरुद्धाला मोहित केले.