ऑनलाईन 33 हजार जणांचा सहभाग
पणजी / प्रतिनिधी
’इन्क्वािझिशन’च्या नावाखाली ख्रिस्ती मिशनऱयांनी गोव्यातील हिंदूंवर प्रचंड अत्याचार केले; पण या नरसंहाराविषयी भारतियांना माहितीच नाही. उलट भारतामध्ये औरंगजेब, सेंट झेव्हियर्स या अत्याचाऱयांचे उदात्तीकरण केले जाते. हिंदूंच्या पूर्वजांवर किती अनन्वति अत्याचार झाले, हे जगासमोर यायला हवे. इतकेच नाही, तर पोपने या अत्याचारांविषयी क्षमा मागितली पाहिजे, अशी मागणी प्रसिद्ध प्रेंच पत्रकार आणि संशोधक फ्रान्सुआ गोतिए यांनी केली. ते पुणे येथे ’गोवा इन्क्वािझिशन’च्या संदर्भातील चित्रप्रदर्शनाचे ’ऑनलाईन’ लोकार्पण केल्यावर बोलत होते.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनाचे ’ऑनलाईन’ लोकार्पण करण्यात आले. हे प्रदर्शन www.goainquisition.info या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी शुभेच्छा दिल्या. फ्रान्स़ुआ गोतिए, शेफाली वैद्य, प्रजल साखरदांडे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यु-टय़ुब, फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून प्रसारण करण्यात आलेला हा कार्यक्रम 33 हजार 800 लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर 74 हजार लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला आहे.
इंग्रजांपेक्षाही पोर्तुगीजांची राजवट अधिक क्रूर होती. गोवा ’इन्क्वािझिशन’चा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट केला जावा, तसेच याविषयीचे एखादे संग्रहालय असावे, अशा मागण्या अनेक वेळा होऊनही अद्यापपर्यंत तसे होतांना दिसत नाही. आपण आपला इतिहास जाणून घेतला पाहिजे, अन्यथा पुढे असे काही घडलेच नव्हते, असे हे लोक सांगतील. गोवा इन्क्वािझिशन ही एक सामाजिक वेदना आहे, असे शेफाली वैद्य यांनी सांगितले.
हिंदूंच्या इतिहासातील काळा अध्याय
वर्ष 1560 ते 1812 या काळात ’इन्क्वािझिशन’च्या नावे हिंदूंवर अनन्वति अत्याचार करण्यात आले. हिंदूंचे मोठय़ा प्रमाणावर धर्मांतर करण्यात आले. कायदे न जुमानणाऱयांना जिवंत जाळण्यात आले. ’गोवा इन्क्वािझिशन’ हा हिंदूंच्या इतिहासातील काळा अध्याय आहे, असे इतिहासकार प्रजल साखरदांडे यांनी सांगितले.
गोव्यातील ’हात कातरो’ खांब राष्ट्रीय स्मारक
गोवा इन्क्वािझिशनच्या इतिहासाचा दुर्मिळ पुरावा ’हात कातरो’ खांब ओल्ड गोवा येथे पूर्णतः दुर्लक्षित आहे. या खांबाचा इतिहास पुरातत्त्व खात्यातून काढून टाकण्याचे षडयंत्र आता चालू आहे. अशा प्रकारचा खांब गोव्यात अस्तित्त्वातच नाही, असे पुरातत्त्व खाते सांगत आहे. ’हात कातरो खांब’ राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित झाला पाहिजे, असे रमेश शिंदे म्हणाले.