ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
उत्तर प्रदेशात थंडीने आतापर्यंत 41 जणांचा बळी घेतला आहे. तर कानपूरमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे.
उत्तरप्रदेशात थंडीने कहर केला आहे. दाट धुक्यामुळे रेल्वे आणि विमान उड्डाणांनाही फटका बसला आहे. उत्तर प्रदेशात गुरुवारी कानपूर शहरामध्ये 17, कानपूर ग्रामीणमध्ये 5, झांसीत 4, बांदात व महोबामध्ये प्रत्येकी 3-3 , हातरस, आग्रा, हमीरपूर मध्ये प्रत्येकी 2-2, कन्नौज, चित्रकूट व अलीगडमध्ये प्रत्येकी 1-1 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच वीज कोसळून कानपूरमधील नौबस्ता व कलक्टरगंज परिसरात दोघांचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशात थंडी पडली असून काल सायंकाळी कानपूर, उन्नाव व जालौनमध्ये अवकाळी पाऊस पडला. इटावात 4.8 डिग्री, बांदात 5.4 डिग्रीसह सर्वात जास्त थंडीची नोंद करण्यात आली. काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या पर्वतीय भागांत सतत होणारी बर्फवृष्टी आणि थंड वारे यांमुळे अवघा उत्तर भारत तीन दिवसांपासून पार गारठून गेला आहे. त्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले असून, अनेक राज्यांमध्ये शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.