ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन वातावरण पेटले आहे. त्यातच आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करा अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.
या पत्रात भातखळकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची आवश्यकता नाही, अशा आशयाचे निवेदन पाठवले असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला होता. मात्र आज नागपुर, अमरावती, गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंनी अशा आशयाचे कोणतेही निवेदन दिले नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.
त्यानंतर भातखळकर यांनी उदय सामंत यांना तात्काळ पदावरून दूर करा अशी मागणी केली आहे.