कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा आणखी सतर्क : कोरोना लक्षणे दिसल्यास तपासणी : जिल्हा रुग्णालयात 215 बेडची व्यवस्था
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आली असून 1 ऑगस्टपासून चेकनाक्मयांवर महसूल, पोलीस व वैद्यकीय अधिकारी यांची संयुक्त पथके तैनात करण्यात येणार आहेत. कोरोनाची लक्षणे दिसणाऱयांची तपासणीही केली जाणार आहे. गणेशोत्सव काळात कोरोना रुग्णांची संभाव्य वाढ लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयात 215 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी दिली.
गणेशोत्सव कालावधीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत जी नियमावली आहे, त्यानुसारच जिल्हय़ात अंमलबजावणी केली जात आहे. नव्याने सूचना आल्यास त्याची अंमलबजावणी करण्यात येईल तसेच लॉकडाऊनमध्ये शिथिलता न आल्यास सद्यस्थितीत असेलेल्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. नियमांची अंमलबजावणी करताना चाकरमानी आणि स्थानिक ग्राम नियंत्रण समित्यांमध्ये वाद होणार नाहीत, याचीही दक्षता घेतली जाणार आहे.
गणेशोत्सव कालावधीमध्ये दीड लाख चाकरमानी येतील, असा अंदाज आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर खारेपाटणसह जिल्हय़ाची प्रवेशद्वारे असलेल्या चेकनाक्मयांवर महसूल, पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी यांची संयुक्त पथके ठेवली जाणार आहेत. त्याठिकाणी संशयित वाटणाऱया म्हणजेच कोरोनाची लक्षणे दिसणाऱयांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून स्वॅब टेस्टिंगला पाठवले जाणार आहेत.
जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्ण संख्या साडेतीनशेपर्यंत गेली, तरी बरे होणाऱया रुग्णांचेही प्रमाण चागले आहे. कोव्हिडं सेंटरची आपण स्वतः पाहणी केली असून त्या ठिकाणी रुग्णांशी संवाद साधला असता चांगल्या प्रकारे उपचार होत असल्याचे त्यांनी सांगितले. जेवणही चांगले मिळत असल्याचे रुग्णांनी सांगितले. कोरोना मुक्त होणाऱयांचे प्रमाण चांगले असले, तरीसुद्धा गणेशोत्सव काळात रुग्ण संख्या वाढली, तर त्याच्यावर औषधोपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये 215 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आवश्यकता भासल्यास तालुक्मयाच्या ठिकाणीही व्यवस्था केली जाणार आहे.
संपूर्ण जिल्हय़ात प्रशासकीय यंत्रणा चांगले काम करीतच आहे. सरपंच व ग्राम नियंत्रण समित्याही चांगले काम करीत आहेत. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवता आले. आता गणेशोत्सव कालावधीमध्येही सर्वांकडून सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. जिल्हय़ातील जनतेने व चाकरमानी यांनीही नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले.
गेल्या चार महिन्यांत महसूल, पोलीस आणि जि. प. आरोग्य यंत्रणा यांनी अतिशय चांगला समन्वय ठेवून काम केले. त्याच पद्धतीने गणेशोत्सव काळात समन्वय ठेवून कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे सांगण्यात आले.
क्वारंनटाईन व्हावेच लागेल
ICMR च्या मार्गदर्शक तत्वांनुसार जिल्हय़ाबाहेरून येणाऱयांना चौदा दिवस क्वारंनटाईन राहावेच लागते. त्यामुळे चाकरमान्यांनी गैरसमज करून घेऊ नये. चौदा दिवसांत कपात होऊन सात दिवस झाले, तर त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल. जी काही नियमांची अंमलबजावणी केली जाते, ती सर्व जनतेच्या आरोग्याच्या काळजीपोटीच केली जाते. कोरोना नियंत्रणासाठी सर्वांनीच सहकार्य करणे अपेक्षित आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.
गणेशोत्सवानंतरच शाळा सुरू
शाळा सुरू करण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. कोरोनाची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात नाही. गत दोन महिन्यांत दीड लाख चाकरमानी आले आहेत. आता गणेशोत्सवासाठी सुद्धा दीड लाख चाकरमानी येण्याची शक्मयता आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्मयता नाकारता येत नाही. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन गणेशोत्सवानंतर शाळा सुरू करण्याचा विचार केला जाईल, असे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले.