प्रतिनिधी/ बेंगळूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर नियंत्रणासाठी रविवारी देशभर जनता कर्फ्यूची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बेंगळूरमधील नम्म मेट्रो रेल्वे सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत मेट्रो रेल्वे सेवा बंद राहिल, असे बीएमआरसीएलचेप प्रवक्ते टी. एल. रवी यांनी सांगितले आहे.
केएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालकांनी देखील बस सेवा बंदबाबत पत्रका काढले असून 22 मार्च रोजी बस सेवा सुरु राहणार नाही. आवश्यकता भासली तरच एक-दोन बसेस सुरू ठेवण्यात येतील, असे सांगितले आहे. ओला-उबर टॅक्सी संघटनेने देखील एक दिवसाकरिता कॅब सेवा बंद ठेवणार असल्याचे सांगितले आहे.