हरियाणातील हिस्सार जिल्हय़ातील नारनौंद या गावात एका विहिरीचा कायकल्प करण्यात आला आहे. यात विशेष ते काय? असा प्रश्न पडू शकतो. तथापि या विहिरीला केवळ एका व्यक्तिने 30 वर्षे प्रयत्न करून जीवनदान दिले आहे. आता ही विहीर आसपासच्या सर्व ग्रामस्थांना अविरत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करीत आहे. या व्यक्तिचे नाव आहे तिलकराज सुनार. ते 50 वर्षांचे आहेत.
या गावात 100 वर्षांपूर्वी एक मोठी विहीर अस्तित्वात होती. तथापि नंतरच्या काळात दुर्लक्ष झाल्याने आणि पडझड झाल्याने ती निरुपयोगी ठरली. परिणामी गावात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली. तिलकराज सुनार यांनी या विहिरीबद्दल ऐकले होते. त्या विहिरीचा जीर्णोद्धार करण्याचा ध्यास त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षीच केला. आणि तेव्हापासून सलग तीस वर्षे अखंड प्रयत्न करून ही विहीर पुन्हा जिवंत केली. यासाठी त्यांना बराच खर्चही आला. शिवाय गावकऱयांची फारशी मदतही मिळाली नाही. तरीही धीर न सोडता त्यांनी एकटय़ाच्या कष्टांवर हे कार्य सातत्याने तीन दशके सुरू ठेवले. विहिरीच्या आसपासच्या भागाची सफाई, विहिरीत अनेक दशके साचलेला गाळ काढणे, विहिरीचे बांधकाम करणे इत्यादी कामे त्यांनी स्वबळावर केली. आता ही विहीर साऱया गावाला पुन्हा पाणी देऊ लागल्यानंतर त्यांच्या कार्याचे महत्त्व सर्वांना समजले आहे.