आपला नायक अनेक वर्षे एकाच ठिकाणी होता. आसपासची माणसं त्याला ओळखत होती. त्यामुळे त्याच्या संशोधनात काही अडथळा आला नाही. विमेदारांच्या नोंदी असलेली त्याची फाईल फुगत गेली. तीनेक हजार नोंदी जमल्या. दरम्यान विमा कचेऱयांमध्ये संगणक आले. तेव्हा त्याने जागेची बचत करण्याच्या हेतूने सर्व नोंदी संगणकावर टाईप करून त्यांचे फोल्डर तयार केले. मग मूळ फाईल फाडून टाकली.
नेमकी त्याच वेळी त्याला नव्याने बढती मिळाली आणि यावेळी नव्या शाखेत त्याची बदली झाली. इथे तो सर्वस्वी नवीन होता. नव्या ठिकाणी देखील त्याने वरि÷ांना विनंती करून क्लेम डिपार्टमेंट मागून घेतले. पण इथे एक संकट त्याची वाट बघत होते.
मृत विमेदाराच्या महिला वारस आल्यावर तो त्यांना विनंती करून कुंडली मागून घेई. हा परिपाठ त्याने इथे सुरू केल्यावर थोडासा घोटाळा झाला. काही महिला कचेरी सुटायच्या वेळी किंवा नंतर येऊन कुंडली देत. अशा वेळी उपचार म्हणून तो त्यांना चहा कॉफी देत असे.
आसपासच्या अपरिचित सहकाऱयांना हे काही ठाऊक नव्हतं. नायकाने आपली संशोधनाची कल्पना कोणाला सांगितलेली नव्हती. त्यामुळे सर्वांना वाटलं की नायक डेथ क्लेमच्या रकमा देताना महिलांची अडवणूक करून किंवा त्यांच्याशी गोड बोलून त्यांच्याकडून पैसे काढतो आहे. आधी कुजबुज सुरू झाली. मग आधी साधे लोक नि नंतर विघ्नसंतोषी माणसे त्याच्याबद्दल बोलू लागली. काही जणांनी त्याच्या विरुद्ध वरि÷ांकडे तक्रार केली. पण भ्रष्टाचाराचा कोणताही पुरावा नसल्याने वरि÷ांनी कारवाई टाळली.
काही दिवसांनी या सर्वाचा अनपेक्षित शेवट झाला. एक महिला विमेदार मरण पावली. तिच्या विम्याचे कागदपत्र संशयास्पद होते. विमा पॉलिसी घेण्यापूर्वी झालेला दुर्धर रोग तिने लपवला होता. तिला क्लेम देणे शक्मय नव्हते. नायकाने तिच्या आजारपणाविषयीच्या कागदपत्रांच्या प्रती स्कॅन करून संगणकावर ठेवल्या. पण तिच्या वारसाचे हात वरपर्यंत पोचले होते.
एके रात्री नायकाच्या टेबलचा खण डुप्लीकेट चावीने उघडून त्यातले कागदपत्र गायब केले गेले. संगणकावरील वैयक्तिक फाईल्स डिलीट केल्या गेल्या. त्यात संशोधनाची फाईल देखील गेली. त्या वारसाला क्लेम मिळाला. नायकाने हताश होऊन नोकरीचा राजीनामा दिला आणि विमनस्कपणे उरलेले जीवन व्यतीत करू लागला. (गोष्ट काल्पनिक आहे. खरी समजू नये. वाचकांना खरी वाटल्यास लेखक जबाबदार नाही)