मराठा क्रांती मोर्च्याच्या बैठकीत खासदार संभाजीराजे यांचा इशारा, राज्य सरकारने समाजाला फसविल्याचा गंभीर आरोप
प्रतिनिधी / नवी मुंबई
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारने हातात आहेत त्या गोष्टी, उपाययोजना न करता केवळ मराठा समाजाला फसविण्याचे काम केले आहे, अशा शब्दात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ठाकरे सरकारवर थेट हल्ला केला. आरक्षण हा आमच्यासाठी समतेचा लढा आहे. आरक्षण आमच्या हक्काचे आहे, ते आम्ही मिळविणारच. मराठा युवकांवर अन्याय करून जर राज्य सरकार राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा घेणार असेल तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही संभाजीराजे यांनी दिला.
मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीनंतर आंदोलनाची पुढील रणनीती ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चासह इतर मराठा संघटनांच्या समन्वयक, पदाधिकाऱयांची नवी मुंबईतील तुंर्भेतील माथाडी भवनमध्ये बुधवारी बैठक झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना संभाजीराजे यांनी आक्रमकपणे भूमिका मांडत ठाकरे सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीला राजेंद्र कोंढरे, सौरभ खेडेकर, संजीव भोर-पाटील, करण गायकर, दिलीप पाटील, सचिन खेडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
वंचित मराठा समाजाकडे लक्ष कोण देणार?
संभाजीराजे म्हणाले, बहुजनांसाठी राजर्षी शाहू महाराजांनी जे आरक्षण दिले. त्यात मराठा समाजही होता. तोच आज वंचित राहिला आहे. मग या मराठा समाजाकडे लक्ष कोण देणार? हा आजचा प्रश्न आहे. मराठÎांसाठी अण्णासाहेब पाटील यांनी पहिला लढा दिला. त्यानंतर अनेक लढे झाले झाले. आजही लढा सुरू आहे. प्रत्येक लढÎात `खांद्याला खांदा लावून मी समाजासोबत राहिल असें मी सांगितले होते आता ती वेळ पुन्हा आली आहे. त्यावेळी सर्व मराठा संघटना एकत्र आल्या आणि येथूनच आझाद मैदानावर महामोर्चा गेला. त्यावेळी तो लढा यशस्वी झाला. त्यावेळी नारायण राणे समिती होती आणि त्यानंतरच आपल्याला ईएसबीसी आरक्षण मिळाले, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.
शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले ते सर्व 18 पगड जातीचे होते. आज जातीय विषमता कमी होण्याऐवजी वाढत आहे. मी सर्व समाजाचा आहे, पण आज मराठा समाज बाहेर फेकला गेला आहे, याचे उत्तर शोधण्याची वेळ आली आहे. एकजुटीने लढण्याची गरज असताना समनव्यक एकमेकांशी भांडताना दिसत आहे. काहींना काहींना समाजात दुफळी निर्माण करायची आहे, अशा शब्दात स्वतंत्र भूमिका घेणाऱया मराठा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे संभाजीराजे यांनी कान टोचले.
राज्य सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक
राज्य सरकारने मराठा समाजाला फसविल्याचा आरोप करताना संभाजीराजे म्हणाले, ज्या गोष्टी हातात आहेत, त्या राज्य सरकारने का केल्या नाहीत?, सारथी संस्था सुद्धा बुडीत घातली, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला काय दिले? हे सारे जण जाणतात. आणखीन किती दिवस राज्य सरकार मराठा समाजा सोबत असा खेळ करणार आहे? असा सवाल करत संभाजीराजे यांनी मराठा आमदारांनी सुद्धा याची जबाबदारी घ्यायला हवी, असे आवाहन केले.
एमपीएससी परीक्षा घेतल्यास वाईट परिणाम
एमपीएससीच्या परीक्षेवर संभाजीराजे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, 427 विद्यार्थी एमपीएससीमध्ये पास झाले. त्यातील 127 मराठा आहेत, पण त्यांच्या नियुक्त्या रखडल्या, त्याला जबाबदार कोण?. 11 ऑक्टोबरला एमपीएससीची परीक्षा आहे. ती सरकारने पुढे ढकलावी. जर राज्य सरकार ऐकणार नसेल त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, स्पष्ट करत मराठा समाजाच एपीएससीची परीक्षा केंद्र बंद पाडेल, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला. कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांत नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र बंद न करता एमीएससीची परीक्षा केंद्र बंद पाडू. त्यामुळे आता पुढचा निर्णय राज्य सरकारने घ्यायचा आहे, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ठाकरे यांचा फोन आला होता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला होता, मी केला नव्हता, असे स्पष्ट करत संभाजीराजे म्हणाले, एमीएससीची परीक्षा झाली, तर त्याचा फटका बसेल, अशी मराठा समाजात भावना आहेत. काय गरज आहे, घाई का करता परीक्षा घ्यायची?. आता ज्यांची वयाची अट संपणार आहे त्यांच्यासाठी वय वाढविण्याची माझी सरकारला विनंती असल्याचे आवाहन त्यांनी केले.
सकल मराठÎांच्या निर्णयाला माझे समर्थन
यापुढे सकल मराठा समाज जे निर्णय घेईल, त्यांना माझं समर्थन आहे. मी कायम तुमच्या बरोबर आहे. सर्व आमदारांना माझी विनंती, मंत्र्यांना निरोप द्या, मराठा समाजाची व्यथा, दु:ख यावर पॅबिनेट मध्ये चर्चा करा. मुख्यमंत्री, मंत्री हे राज्यपाल राष्ट्रपती यांना सांगून विशेष अधिकार मिळू शकतात, असे संभाजीराजे म्हणाले.
ओबीसींमध्ये घुसायचे नाही
93 टक्के मराठा समाज गरीब आहे. ओबीसी समाजाचे अनेक नेते आले. धनगर समाजचे मुस्लिम समाजाचे नेते आले, त्यांचं कौतुक आहे. आम्हाला ओबीसीमध्ये घुसायचं नाही. ओबीसी नेते आणि आमच्यात कुठलेही दुरावे होणार नाही, असेही संभाजीराजेंनी सांगितले.
खासदार उदयन राजे यांची पुन्हा एकदा बैठकीला दांडी
या बैठकीला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अनुपस्थित राहले. उदयनराजे आणि संभाजीराजे हे दोन्ही राजे उपस्थित राहणार असे, नरेंद्र पाटील यांनी सांगितले होते. उदयनराजेंच्या अनुपस्थितीची चर्चा बैठकीनंतर सुरू होती.