शक्तिशाली हवाई संरक्षण प्रणाली – पाकिस्तान-चीनच्या सीमेवर तैनात होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रशियन बनावटीची शक्तिशाली हवाई संरक्षण प्रणाली एस-400 ची पहिली खेप भारतात पोहोचली आहे. जगातील सर्वात प्रगत हवाई संरक्षण प्रणाली मानली जाणारी एस-400 भारताची शक्ती हवेत अभेद्य करेल. ही यंत्रणा 400 किमी अंतरावरील हवेत शत्रूची क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि विमानांवर हल्ला करू शकते. ही यंत्रणा पश्चिम सीमेजवळ तैनात केली जाणार असून पाकिस्तान आणि चीनच्या पश्चिम आणि उत्तर सीमेवरील धोक्मयांना सामोरे जाऊ शकते. ऑक्टोबर 2018 मध्ये रशिया आणि भारताने एस-400 च्या पुरवठय़ाबाबत करार केला होता.
चीन आणि भारताचा धोका पाहता भारताला एस-400 ची नितांत गरज होती. मात्र, या कराराला अमेरिका सुरुवातीपासून विरोध करत होती. तरीही रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्या नुकत्याच झालेल्या भारत भेटीदरम्यान लवकरच त्याचा पुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याची दुसरी तुकडीही नवीन वर्षाच्या प्रारंभी दाखल होणार आहे. भारताला अशी एकूण 5 युनिट्स मिळणार आहेत.
40 हजार कोटींचा करार
एस-400 ही हवाई संरक्षण प्रणाली हवेतून होणारे हल्ले रोखते. शत्रू देशांचे क्षेपणास्त्र, ड्रोन, रॉकेट लॉन्चर आणि लढाऊ विमानांचे हल्ले रोखण्यासाठी ते प्रभावी आहे. हे रशियाच्या अल्माझ सेंट्रल डिझाईन ब्युरोने डिझाईन केले आहे आणि जगातील सर्वात प्रगत हवाई संरक्षण प्रणालींमध्ये गणले जाते. भारत आणि रशियामध्ये 2018 मध्ये ए-400 च्या 5 युनिट्ससाठी सुमारे 40 हजार कोटी रुपयांचा करार झाला होता. ही क्षेपणास्त्र प्रणाली एकाच वेळी 36 लक्ष्यांना लक्ष्य करू शकते. हे ठिकाणाहून ट्रकवर ठेवलेले असतात आणि एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी सहजपणे हलवता येतात.