18 वर्षे 2 महिन्यांनंतर वैवाहिक नाते संपुष्टात
दक्षिणेचा अभिनेता धनुष आणि सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हे विभक्त झाले आहेत. 18 वर्षांच्या संसारानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही सोशल मीडिया पोस्टद्वारे स्वतःचे नाते संपुष्टात आल्याची माहिती दिली. धनुष आणि ऐश्वर्या यांना दक्षिणेतील पॉवर कपल मानले जात होते.
आम्ही 18 वर्षांपर्यंत मैत्री, दांपत्य, पालक आणि परस्परांचे हितचिंतक होऊन विकास, समजुतपणा आणि भागीदारीचा दीर्घ प्रवास केला. आज आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत, तेथून आम्हा दोघांच्या वाटा वेगळय़ा होत आहेत. मी आणि ऐश्वर्याने दांपत्य म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतःला चांगल्याप्रकारे जाणून घेण्यासाठी आम्ही वेळ घेऊ इच्छितो. आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमच्या खासगीत्वाची काळजी घ्या असे धनुषने म्हटले आहे. ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर अशाप्रकारची पोस्ट शेअर केली आहे.
धनुषने 18 नोव्हेंबर 2004 रोजी रजनीकांत यांचे ज्येष्ठ कन्या ऐश्वर्यासोबत विवाह केला होता. या जोडप्याला यात्रा आणि लिंगा अशी दोन मुले आहेत. धनुषने ऐश्वर्याचे दिग्दर्शन असलेला चित्रपट ‘3’मध्ये काम केले होते. या चित्रटातील गाणे ‘कोलावरी डी’ प्रचंड गाजले होते.