पुणे / प्रतिनिधी
राज्याला आवश्यतेएवढे ऑक्सिजन सिलेंडर मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती असून, पुण्यातील जम्बो रुग्णालयात काही दिवसांतच 300 हून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्याने गडबड उडाल्याची कबुली उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. जम्बोतील स्टाफला येथील स्थिती हाताळणे जमत नसेल, तर संपूर्ण स्टाफ बदलण्याच्या सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विधान भवन सभागृहात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व ज्ये÷ नेते खासदार शरद पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या &ंउपस्थितीत कोरोना विषाणू प्रतिबंधत्मक उपाययोजनांच्या आढावा व नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, पिंपरीमधील जम्बो रुग्णालयाबाबत काही तक्रारी नाहीत. मात्र, पुण्यातील जम्बो रुग्णालयाबाबत तक्रारी आल्या आहेत. या रुग्णालयात टप्याटप्प्याने रुग्ण दाखल होतील, अशा पद्धतीने नियोजन केले होते. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये अचानक रुग्णांची संख्या वाढल्याने सर्वत्र गडबड झाली. या रुग्णालयातील संबंधित स्टाफला यासंदर्भातील परिस्थिती हाताळता येत नसेल, तर तो स्टाफ बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नातेवाईकांना त्यांच्या रुग्णाबाबत सर्व माहिती मिळायला हवीच. स्क्रिनवर ही माहिती देण्याच्या सूचनाही करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.
25 ते 30 टक्के नागरिक मास्क वापरत नाहीत, अस निदर्शनास आले आहे. मास्क न वापरता घराबाहेर पडणाऱया नागरिकांवर आणि थुंकणाऱयांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ऍम्ब्युलन्सचा डेटा एकत्र ठेऊन सर्वांना ती उपलब्ध करून द्यायच्या सूचनाही देण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले, पुण्यातील लॉकडाऊन उठवण्याबाबत वेगवेगळी मते होती. पुण्यात औद्यागिक क्षेत्र असून येथील कामगारांचा प्रश्न मोठा आहे. लॉकडाऊन उठवण्याची मागणी सातत्याने होत होती. मुख्यमंत्री ही तसे म्हणत होते. मुंबईप्रमाणे टप्याटप्याने लॉकडाऊन उठवा. व्यापारी आणि व्यावसायिक यांच्याकडूनही लॉकडाऊन उठवण्याबाबत मागणी होत होती. पण अद्याप शाळा, मॉल्स, थिएटरसह अनेक बाबी बंदच असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
चौकशी अहवालानंतर दोषींवर कारवाई
पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूबाबत जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्यांच्यावर ससूनचे प्रभारी अधि÷ाता डॉ. मुरलीधर तांबे यांता अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. त्यांच्याकडून मला सोमवारी अहवाल मिळणार असून दोषी असलेल्यांवर त्वरित कारवाई केली जाईल, असेही पवार यांनी सांगितले.
परीक्षा घेण्याबाबत मतमतांतरे
परीक्षा घेण्यावर मतमतांतरे आहे. मंत्री उदय सामंत यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. घरबसल्या परीक्षा घ्यायच्या याबाबत चर्चा सुरू आहे. पण काही विद्यार्थी याला विरोध करत आहेत. कोरोनासारख्या परिस्थितीत ही बाब स्वीकारणे गरजेचे असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.