अनलॉकमुळे उत्पादन कारखाने सुरू- उत्पादन वाढीवर असणार भर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारीमुळे थांबलेले ऑटो क्षेत्रातील व्यवहार आता गती घेताना दिसत आहेत. अनेक राज्यांनी अनलॉक प्रक्रियेसह निर्बंध मागे घेतल्याने विविध उद्योग व्यवसाय पूर्ववत होत आहेत. ऑटो क्षेत्रातल्या कंपन्याही आता वाहन उत्पादनाला गती देताना दिसत आहेत.
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा अनेक राज्यांना याखेपेस फटका बसला आहे. यात उद्योग व व्यवसायांचेही मोठे नुकसान झाल्याचे पहायला मिळाले आहे. आता अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली असून बंद असलेली शोरुम्स व विक्री केंदे सुरू करण्यात आली आहेत. कर्मचारी वर्ग परतल्याने आता मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन प्रक्रियेला वेग दिला जाईल. एप्रिल व मे महिन्यात लॉकडाऊनच्या काळात कंपन्यांनी 50 टक्के कर्मचाऱयांसह काम केले होते. आता उत्पादन व विक्री सेवा गतीमान होणार आहे.
सेमी कंडक्टरची टंचाई
पण सेमी कंडक्टरच्या टंचाईमुळे वाहन उत्पादनावर काहीसा परिणाम होण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. पुढील तिमाहीपर्यंत उत्पादन प्रक्रियेवर परिणाम राहू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
मारुती सुझुकीने वाहन निर्मिती प्रक्रियेला सुरुवात केली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ती सुरक्षितता बाळगली जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे कंपनीने 36 हजारहून अधिक कर्मचाऱयांना पहिला लसीचा डोस दिला आहे. मेमध्ये 8 लाख 6 हजार 755 वाहनांचे उत्पादन घेतले गेले होते. जूनमध्येही उत्पादन कमीच राहणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे.