कंग्राळी बुद्रुक : कंग्राळी बुद्रुक गावाला धावणाऱया बसेस वेळेवर येत नसल्यामुळे प्रवासी वर्गाबरोबर शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. तासन्तास बसथांब्यावर ताटकळत थांबावे लागत असल्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. राज्य परिवहन मंडळाच्या संबंधित अधिकाऱयांनी याकडे त्वरित लक्ष देऊन बसेस वेळेवर सोडाव्यात, तसेच विद्यार्थ्यांबरोबर प्रवासीवर्गाची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी करण्यात येत आहे. कंग्राळी बुद्रुक गाव बेळगावपासून हाकेच्या अंतरावर आहे. राज्य परिवहन मंडळाने प्रवाशावर्गाबरोबर शालेय विद्यार्थ्यांची सोय होण्याचा उद्देशाने केएलई हॉस्पिटलमार्गे व शाहूनगरमार्गे दोन्हींकडून बसेस सुरू केल्या आहेत. कंग्राळी गावातून हजारोंच्या संख्येने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी बेळगावला शिक्षणासाठी जात असतात. इतर नागरिकसुद्धा आपल्या कामासाठी रोज बेळगावला ये-जा करत असतात. परंतु सकाळच्या सत्रात सकाळी सात ते दहापर्यंत बसेस वेळेत येत नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे तास चुकत आहेत. सायंकाळीसुद्धा 5 ते 7 पर्यंत बसेस वेळेवर येत नसल्यामुळे राणी चन्नम्मा बसस्थानकावर विद्यार्थ्यांना ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे घरी उशिरा पोहचावे लागत असल्यामुळे अभ्यासाचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना केल्या. राज्य परिवहन मंडळाच्या संबंधित अधिकाऱयांनी बसेस वेळेवर सोडून होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी करण्यात येत आहे.
Previous Articleबेकिनकेरे परिसरात रात्रीचा सिंगल फेज वीजपुरवठा सुरळीत करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.