सीडीएस रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेचा अहवाल संरक्षणमंत्र्यांना सादर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तामिळनाडूमध्ये 8 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपिन रावत आणि अन्य 13 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेच्या तपास अहवालात खराब हवामान हे हेलिकॉप्टर अपघाताचे सर्वात मोठे कारण मानले गेले आहे. भारतीय हवाई दलाच्यावतीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशी अहवालाबाबत 45 मिनिटांचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणामध्ये तपासातील निष्कर्षांबरोबरच अनेक महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांनी या अपघाताची ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ केली आहे. ते विमान अपघात प्रकरणांचा तपास करणाऱया देशातील सर्वोत्तम तपासकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. ते सध्या बेंगळूर येथे मुख्यालय असलेल्या भारतीय हवाई दलाच्या प्रशिक्षण कमांडचे प्रमुख आहेत.
संरक्षणमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या अहवालामध्ये अपघाताच्या कारणाबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. तपास पथकाने दिलेल्या माहितीनुसार, त्यादिवशी हेलिकॉप्टरचे पायलट विंग कमांडर पृथ्वीसिंह चौहान हे होते. त्यांनी हेलिकॉप्टर कोसळण्यापूर्वी 8 मिनिटे हेलिकॉप्टर उतरवायला मिळत असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यावेळी हेलिकॉप्टर खूप खालीपर्यंत म्हणजे जमिनीपासून सुमारे 500-600 मीटर उंचीपर्यंत आणले होते, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. ढगाळ वातावरणामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे त्यांनी हेलिकॉप्टर खाली आणल्याचेही अहवालात नमूद केले आहे. तसेच तपास अहवालात कोणतीही वैयक्तिक चूक किंवा नुकसान होण्याची शक्मयता पूर्णपणे नाकारण्यात आली आहे.
नियमावली बदलण्याची गरज
वरि÷ लष्करी अधिकाऱयांना घेऊन जाणाऱया हेलिकॉप्टरबाबत ‘एसओपी’मध्ये म्हणजे नियमावलीमध्ये बदल करण्याची शिफारसही तपास पथकाने केली आहे. त्यादिवशी हेलिकॉप्टर टेकडीवरील रेल्वे ट्रकच्या मार्गावर उड्डाण करत होते आणि दाट ढगांनी वेढले गेल्याने अचानक अपघात झाला असे सांगतानाच पूर्वीच्या नियमावलीचा फेरआढावा घेण्याची वेळ असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. हेलिकॉप्टरच्या लँडिंगची तयारी करताना मानवी चुकांची शक्मयता किंवा क्रू मेंबरचे लक्ष विचलित होण्याची शक्मयता यासह अपघाताच्या सर्व संभाव्य पैलूंचा पोलीस पथकाने आढावा घेतल्याचे सांगितले जाते.