जागतिक कर्करोग दिन विशेष
मनीषा सुभेदार / बेळगाव
‘क्लोज द केअर गॅप- काळजी घेण्यासाठी दरी मिटवा’
यंदाच्या कर्करोग दिनाचे हे घोषवाक्मय आहे. या घोषवाक्मयाला विशेष महत्त्व यासाठी आहे, की आजही विकसित, विकसनशील देशांमध्ये कर्करोगच नव्हे तर अनेक आजारांच्याबाबत काळजी घेण्यामध्ये ढिलाई दिसते. ही दोन प्रकारची आहे. एक म्हणजे व्यक्ती स्वतः आपल्या आजाराकडे दुर्लक्ष करते किंवा कुटुंबीयांनी घरातील सदस्याच्या आरोग्याबाबत किंवा आजाराबाबत असलेली उदासीनता. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने हे घोषवाक्मय दिले आहे.
कर्करोगाबद्दल भीती कमी झाली असली तरी ती पूर्णतः संपलेली नाही. आजही याबाबत उघड बोलणे किंवा डॉक्टरांकडे जाणे याचे प्रमाण कमी आहे. कर्करोग बरा होऊ शकतो, हे वास्तव लक्षात घेतले असता याबाबत काळजी, उपचार आणि पथ्य यावर भर देणे आवश्यक आहे. याच संदर्भात बेळगावचे नामवंत कर्करोग तज्ञ डॉ. रोहन भिसे यांची ही मुलाखत.
- हे घोषवाक्मय हेतूतः देण्यात आले असून अतिशय समर्पक आहे. आपण काय सांगाल?
– कॅन्सर केअर सर्वत्र सारखी नाही. गरीब आणि श्रीमंत देशांमध्ये आजही दरी आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कर्करोगाबद्दल जागरुक होऊ शकेल, पण दुसऱया व्यक्तीच्या कर्करोगाबद्दल त्याला मदत करण्याची, त्याची काळजी घेण्याची गरज आहे. दोन देशांमधील आणि दोन व्यक्तींमधील अंतर किंवा दरी दूर करण्याच्यादृष्टीने हे घोषवाक्मय महत्त्वाचे आहे.
- कर्करोग म्हणजे काय?
– कर्करोग म्हणजे एक गाठ. जी शरीराच्या एका भागातून दुसऱया भागाकडे पसरण्याची शक्मयता अधिक असते आणि नैसर्गिकदृष्टय़ा शारीरिक हालचालींवर बंधने येऊ शकतात.
- व्यसनाधीनता याला किती कारणीभूत ठरते?
– निश्चितपणे व्यसन कर्करोगाला आमंत्रण देते. गुटखा, सिगारेट आणि मद्यपान ही तीन व्यसने घातक आहेत. कोणत्याही स्वरुपात तंबाखू खाण्याचे प्रमाण संपले तर जगातील 50 टक्के कर्करोग कमी होऊ शकतो. मात्र, कोणतेही व्यसन नाही म्हणून कर्करोग होणारच नाही, असे मात्र नसते.
- कर्करोग वाढण्याची कारणे कोणती?
– मुख्य म्हणजे व्यायामाचा अभाव. हायकॅलरी पदार्थांचे अतिसेवन, अलीकडे पदार्थ शिजवून आणि तळून खाण्यापेक्षा जाळून खाण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय तेही अधेमध्ये नाही तर सातत्याने होते. सततचा मांसाहार शरीराला घातक आहे. शिवाय शारीरिक हालचालींचा अभाव हे केवळ कर्करोगच नव्हे तर सर्वच रोगांचे कारणे होऊ शकते.
- या पार्श्वभूमीवर डाएट किती महत्त्वाचे?
– आपले डाएट प्रूट बेस किंवा प्लांट बेस असायला हवे. व्यायामाला महत्त्व तर हवेच. परंतु, वजन नियंत्रित ठेवणे हे निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहे. आपण मधुमेह झाला किंवा बीपी वाढल्यावर जी काळजी घेतो, तशीच काळजी कॅन्सर डोळय़ासमोर ठेवूनसुद्धा घ्यायला हवी. जेणेकरून या रोगाची शक्मयता कमी
होते.
- समाजाची मानसिकता बदलली आहे का?
– पूर्वी कर्करोग झाल्यानंतर माणूस जगणारच नाही, ही मानसिकता होती. त्यामध्ये निश्चित बदल झाला आहे. किमान डॉक्टरांना जाऊन भेटावे, तपासावे इथपर्यंत बदल झाला आहे. परंतु, आजही प्रामुख्याने या रोगाची वाच्यता करणे सहसा टाळले जाते. अन्यत्र अनेक उपचार घेऊन शेवटच्या टप्प्यावर कर्करोग तज्ञाकडे आल्यास गुंतागुंत वाढू शकते. लवकर निदान होणे आवश्यक आहे व तशी जागृती करणे गरजेचे आहे.
- स्त्री आणि पुरुषांना होणाऱया कर्करोगाचे स्वरुप कोणते आहे?
– पुरुषांना फुफ्फुसाचा व तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक आहे. परंतु, त्यांनी तंबाखू व तत्सम पदार्थ खाणे थांबविल्यास कर्करोग होण्याचे प्रमाण कमी होईल किंवा लवकर उपचाराने तो बरा होईल. महिलांना बेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण अधिक आहे. गाठ असूनही ती दुखत नाही म्हणून महिलांनी दुर्लक्ष करू नये.
- केमोथेरपी गरजेचीच असते का?
– नाही. कॅन्सरच्या स्वरुपानुसार उपचार पद्धतीत बदल करावे लागतात. ब्लड कॅन्सरमध्ये सर्जरीची भूमिका खूप कमी आहे. फक्त निदानासाठी बायोप्सी करावी लागते. कारण सर्जरीने गाठ काढली जाते. केमोथेरपीचा उद्देश हा कर्करोग नियंत्रणात ठेवण्यासाठी आहे. त्याचे काही दुष्परिणाम होता. पण आता उलटी थांबविण्यासाठी काही औषधे उपलब्ध आहेत. त्यामुळे काळजीचे कारण नाही.
- या दिनाच्या निमित्ताने आपण काय सल्ला द्याल?
– रुग्णाने आणि कुटुंबीयांनी वास्तव स्वीकारायला हवे. अनेकदा रुग्णांपासून सत्य लपविण्याचा प्रयत्न कुटुंबीय करतात. परंतु, रुग्णाला कल्पना देणे आणि त्याचे मानसिक संतुलन ढळू नये, यासाठी समुपदेशन करणे अधिक महत्त्वाचे आहे. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर घाबरून न जाणे व वास्तवाचा स्वीकार करणे हा अर्धाअधिक उपचार होतो. दुसरे म्हणजे दिलेल्या घोषवाक्मयानुसार परस्परांना मदत करणे महत्त्वाचे.