मार्च 2021 पर्यंत कर्जमुक्त होण्याचा कंपनीचा मानस, 30 एप्रिलला होणार अंतिम निर्णय
वृत्तसंस्था / मुंबई
बाजारमूल्याच्या स्पर्धेत देशात सर्वोच्च स्थानी असणारी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी कर्जमुक्तीसाठी राईट इश्यू लावण्याचा विचार करत आहे. यावर अंतिम निर्णय हा कंपनीचे संचालक मंडळ 30 एप्रिल रोजी घेणार असल्याचे रिलायन्सने यासंदर्भातील शेअर बाजाराला सांगितले आहे.
रिलायन्सच्या या गोष्टीचा परिणाम कंपनीच्या तिमाही अहवालवर होणार असल्याचे संकेत आहेत तर रिलायन्सचे बीएसईत 23 लाख समभाग आहेत. ज्यातील निम्मे समभाग हे मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे असल्याचे सांगितले आहे. मंगळवारी सकाळी कंपनीचे बाजारमूल्य 8.85 लाख कोटी रुपये होते.
सार्वजनिक रुपाने निधी जोडणार
रिलायन्सच्या डोक्मयावर 3.5 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. ऑगस्ट 2019 मध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी त्यांची कंपनी 18 महिने म्हणजे मार्च 2021 पर्यंत कर्जमुक्त होणार असल्याची घोषणा केली आहे. कर्जमुक्तीसाठी कंपनी प्रत्येक पर्यायाचा विचार करणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला रिलायन्सच्या संचालक मंडळाने नॉन कन्वर्टेबल डिबेंचरच्या आधारे 25 हजार कोटी जमा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता राईट इश्यूच्या आधारे कंपनी तब्बल 29 वर्षांच्या कालावधीनंतर सार्वजनिक स्वरुपात ही कर्जाची रक्कम उभारण्याची योजना आखत आहे. या अगोदर 1991 मध्ये रिलायन्सने हा पर्याय वापरला होता असेही कंपनीने सांगितले आहे.
काय आहे राईट इश्यू
शेअर बाजारात नेंदणीकृत कंपन्यांकडून भांडवल उभारण्यासाठी राईट इश्यू लावण्यात येतो. याच्या आधारे कंपन्या आपल्याकडे असणाऱया अतिरिक्त समभाग खरेदीला मंजुरी देतात. यामुळे समभागधारक एका निश्चित प्रमाणातच हे समभाग खरेदी करु शकतात. या प्रकारच्या समभाग खरेदीमुळे कंपनीच्या मालकांवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडत नसल्याचे म्हटले आहे.