बेंगळूर/प्रतिनिधी
लोकांना त्यांच्या धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यास, रक्षा विसर्जन करण्यास आणि मृत्यू कार्यक्रम करण्यास परवानगी देताना राज्य सरकारने सोमवारी अधिकाऱ्यांना अशा विधींवर प्रतिबंध घालू नका, असे सांगितले आहे.
रक्षा विसर्जन आणि मृत्यू सोहळ्यासाठी जाणाऱ्या अनेक लोकांना रोखण्यात आले आहे हे लक्षात घेता, सरकारने जास्तीत जास्त चार लोकांना यासाठी प्रवास करण्यास परवानगी देण्याचे आदेश जारी केले.
लोकांना या समारंभांना जाताना रोखू नका, असे जिल्हाअधिकारी आणि पोलिसांना सांगण्यात आले आहे. तथापि, या समारंभांसाठी प्रवास करणार्या सर्वांना सर्व कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे आदेशात नमूद केले आहे.