बेंगळूर/प्रतिनिधी
आतापर्यंत ग्रामीण भागात कोरोना संसर्ग न पसरवण्याचा दावा करणारे आरोग्य विभाग आता ग्रामीण भागामध्येही कोरोना डोके वर काढत आहे असा विश्वास बसू लागला आहे. राज्यात मंगळवारपर्यंत एकूण ५,९२,९११ रूग्णांपैकी सुमारे २५ टक्के रुग्ण हे राज्यातील ग्रामीण भागातील आहेत. तसेच दरम्यान राज्यात बुधवारी कोरोना बाधितांची एकूण संख्या ६ लाखाच्यावर गेली आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना आणि सामाजिक समस्यांमुळे खेड्यात चाचणी व संपर्क साधणे आव्हानात्मक आहे. तसेच घरी क्वारंटाइन व्हावं हे लोकांना पटवून सांगणं देखील सोपे नाही. कोरोना अहवाल सकारात्मक आल्यानंतर लोक कुटूंबाबद्दल माहिती देण्यास टाळाटाळ करतात.
डेटा एंट्री ऑपरेटर आणि आरोग्य कर्मचारी यांचा अभाव कोरोना व्हायरस नियंत्रणास अडथळा आणत आहे. दोन आठवड्यांपूर्वी राज्य शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये संबंधित कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. जर राज्यात ग्रामीण भागात कोरोना विषयक माहिती लपवण्याचा प्रयत्न केला तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.