बेंगळूर/प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून उत्तर कर्नाटकच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. तर काही ठिकाणी पुरामुळे लोकांना गावे खाली करावी लागली आहेत. यासर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांच्या उपायुक्तांसह परिस्थितीचा आढावा घेतला.
पाऊस आणि पुरामुळे नुईकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये बिदर, विजापूर, बागलकोट, गुलबर्गा, रायचूर, यादगीर आणि बेळगाव यांचा समावेश आहे.