बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटकच्या दावणगिरी जिल्ह्यातील वन व अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तुंगभद्रा नदीला पूर आल्याने कित्येक दिवसांपासून झाडांवर अडकलेल्या ५० पेक्षा जास्त माकडांना वाचवण्यासाठी चार दिवसांचे बचावकार्य सुरू होते.
मुसळधार पावसाने अधिकाऱयांना धरणाचे दरवाजे उघडण्यास भाग पाडले. पण यामुळे अनेक जनावरे अडकून पडली. दावणगिरी जिल्ह्यातील हरिहर तालुक्यातील राजनहळ्ळी जवळील झाडावर सुमारे ५५ वानरांची टोळी अडकली होती आणि त्यांना पुराच्या पाण्याने वेधले होते. बचावकार्यानंतर त्यांची सुटका करण्यात येत आहे.