बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होत असली तरी येत्या काही दिवसात तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी तिसरी लाट आणि तज्ज्ञांनी वर्तविलेल्या अंदाजावरून जर आम्ही सप्टेंबर अखेरीस किमान ८० टक्के प्रौढ व्यक्तींचे लसीकरण केले तर तिसरी लहर येऊ शकणार नाही. जरी तिसरी लाट आली तर ती खूप सौम्य असेल, म्हणूनच मी कर्नाटक सरकारला विचारत आहे की ते या आव्हानाला तयार आहेत का? ” असे शिवकुमार म्हणाले.
लसीचे महत्व यावर जोर देताना ते म्हणाले, कर्नाटक सरकारने आतापर्यंत पात्र व्यक्तींपैकी केवळ ७ टक्के लोकांना दोन्ही डोस दिले आहेत. “सरकारने किती डोस दिले आहेत याबद्दल बोलणे थांबवावे. डबल डोस म्हणजे काय. फक्त एकच डोस घेतल्यास फारच कमी संरक्षण मिळते. दोन्ही डोसमुळे खूप जास्त संरक्षण मिळते. मुंबई, लंडन, न्यूयॉर्कमधील अभ्यास “दोन्ही डोस घेतल्याने आपले रक्षण होईल,” असे एका कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकात सांगितले.
तज्ज्ञांच्या मते तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वात जास्त धोका आहे, हे लक्षात घेऊन ती चिंताजनक बाब असल्याचे म्हणत केपीसीसी प्रमुख म्हणाले, “आम्हाला तिसरी लाट नको आहे. तिसरी लहर आम्ही दूर करू शकतो. आपल्याकडे सर्व काही आहे. तिसरे लहर सुरू होण्यापूर्वी ८० टक्के लोकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. “