बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी, रस्ते वाहतूक महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे अत्यावश्यक सेवा देखभाल अधिनिय (ईएसएमए) लावण्याच्या निर्णयावर अवलंबून परिस्थितीचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे संप न करता कामावर परतावे, असे ते म्हणाले.
जनतेची गैरसोय झाल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आवाहन केले. संपाच्या मागे काही लोकांचा “स्वार्थी हेतू” असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. येडियुरप्पा यांनी, “आम्ही त्यांच्या परिवहन कामगारांच्या नऊ पैकी आठ मागण्या पूर्ण केल्या असूनही या अडचणी येत आहेत. मागण्या मेनी करूनही बस थांबविल्या आहेत आणि जनतेसाठी अडचणी निर्माण केल्या आहेत. मी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की सर्वानी कामावर परत या, आम्ही याविषयावर मार्ग काढू शकतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी, अंतरिम मदत म्हणून पगाराच्या ८ टक्के वाढीसाठी सरकारने सहमती दर्शविली आहे, परंतु आचारसंहिता लागू झाल्यामुळे याची त्वरित अंमलबजावणी होऊ शकत नाही आणि निवडणूक आयोगाला पत्र पाठविण्यात आले आहे. परवानगी मिळाल्यांनतर अंमलबजावणी केली जाईल असे ते म्हणले.
आम्ही खासगी वाहनांच्या मदतीने पर्यायी व्यवस्था केली असली तरीही ते संपावर जात आहेत, हे चुकीचे आहे. त्यांनी आम्हाला कठोर उपाययोजना करण्यास भाग पाडू नये,” असे ते म्हणाले.
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन कर्मचारी संघटनेच्या अंतर्गत कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (केएमआरटीसी), उत्तर पश्चिम कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एनडब्ल्यूकेआरटीसी) आणि ईशान्य कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एनईकेआरटीसी) चे कामगार हे आजपासून म्हणजे ७ एप्रिलपासून संपावर आहेत.