रुग्णसंख्या 2302, तर 62 जण दगावले
प्रतिनिधी / मुंबई
कल्याण डोंबिवली मध्ये सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्ण संख्येने शतकी आकडा ओलांडला आहे .मागील 24 तासात कल्याण डोंबिवलीत 131 नवीन रुग्णांची भर पडल्याने आजमितीला 2302जणांना कोरोनाने गाठले आहे .तर काल 20 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने आजमितीला 1033 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत .तर 78 वर्षीय दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाने आज मितीला 62 जणांचा बळी घेतला आहे .
कल्याण डोंबिवली मध्ये कोरोनाने एकच थैमान घालण्यास सुरुवात केली असून शहराला जणू कोरोनाने मगरमिठी मारली आहे .सलग चौथ्या दिवशी कोरोना बधितांच्या आकड्याने शंभरी ओलांडली आहे .मागील 24 तासात पुन्हा नव्याने 131 रुग्णांची भर पडल्याने रुग्णांचा आकडा 2302 पर्यन्त पोहचला आहे .तर मागील 24 तासात 20 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजमितीला 1033 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत .तर 78 वर्षीय डोंबिवली पूर्व पुरुष ,56 वर्ष डोंबिवली पश्चिम या दोघांचा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे .त्यामुळे आजमितीला पालिका क्षेत्रातील मृतांची संख्या 62 वर पोहचली आहे
.कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील असून विविध उपाययोजना राबवत असल्याचा दावा करण्यात आला असले तरी वाढती रुग्ण संख्या पाहता या उपाययोजना कमी पडत असल्याचे दिसून येत आहे . कोरोना बाधितांची साखळी तोडण्यासाठी महत्वाची असणारे कॉन्टॅक्ट ट्रेसिगबाबत पालिका प्रशासन आजही उदासिन असल्याने रुग्णाचा आकडा दिवसागणिक फुगत चालला आहे .त्यातच शहरातील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत असल्यामुळे नागरिकांचा वावर वाढू लागला आहे यामुळे करोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागले असून राज्य शासनाने देखील धोक्याचा इशारा देत सज्ज होण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनलोक काळात देखील करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून कंटेन्मेंट झोनवर लक्ष केंद्रित करून या परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला फारसे यश आलेले नसल्याचे रोज सापडलेल्या रुग्णाच्या संख्येवरून दिसत आहे.