मनसा क्रिएशन्सतर्फे आंतरराष्टीय कविता दिवस साजरा
पणजी/वार्ताहर
कविता थेट मनातून उतरते. ती जगण्याला अर्थ देते. कवितेने मला बळ दिले, सामर्थ्य दिले. कविता म्हणजे तुमच्या, माझ्या जीवनाला अर्थ देणारी परिभाषा आहे, अश्या शब्दात इन्स्टिटयूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष, कवी दशरथ परब यांनी कवितेविषयी आपले मत व्यक्त केले. मनसा क्रिएशन्सतर्फे आयोजित केलेल्या आंतरराष्टीय कविता दिवसाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर विशेष निमंत्रित म्हणून माहिती व प्रसिद्धी संचालनालयाचे सहा.माहिती अधिकारी श्याम गांवकर, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष राजमोहन शेटय़?, मिरामार युथ हॉस्टेलचे संचालक अनंत जोशी, कवी गीतकार जॉन आगियार, मनसा क्रिएशन्सच्या अध्यक्ष कालिका बापट उपस्थित होत्या. आंतरराष्टीय कविता दिवसाच्या निमित्ताने आपली काव्यपुष्पे या काव्योत्सवात अर्पण कराव्या या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे कालिका बापट यांनी सांगितले. निवेदक राजनी रायकरहि यावेळी उपस्थित होत्या. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन केले.
मनसा क्रिएशन्सतर्फे आंतरराष्ट्रीय कविता दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने मिरामार पणजी येथील युथ हॉस्टेलमध्ये “काव्योत्सव ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कवी दशरथ परब यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून उपस्थितांना ,मार्गदर्शन केले. श्याम गावकर यांनी उपस्थित कवींचे कौतुक करून, अश्या कार्यक्रमांसाठी माहिती व प्रसिद्धी खात्याचे सदैव सहकार्य आहे असे सांगितले. इतर मान्यवरांनीही यावेळी आपली मते व्यक्त केली. त्यानंतर निमंत्रित कवी कवयित्री?चे कविसंमेलन झाले.
पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी होते कवी गौरीश वेर्णेकर. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या “काव्यरंग” कविसंमेलनात दशरथ परब, श्याम गावकर, राजमोहन शेटय़?, अनंत जोशी, राजू भिकारो नाईक, जॉन आगियार, दुर्गाकुमार नावती , प्रदीप नाईक, प्रकाश क्षीरसागर, विठ्ठल शेळके यांचा सहभाग होता.
त्यानंतर प्रा.पौर्णिमा केरकर यांच्या अध्यक्षतेखाली “काव्यपंचमी” कविसंमेलन झाले. यात मीना समुद्र, सृष्टी नाईक, इंदू परब, डॉ.नीता तोरणे, प्रमोद कारापूरकर , डॉ. आरती दिनकर, नूतन दाभोळकर, सुभाष शाह, दीपा मिरिंगकर, सुनीता शाह, डॉ. सुनेत्रा कळंगुटकर, आरती मोने, मेघना कुरुंदवाडकर, अक्षता किनळेकर, डॉ. सारिका अडविलकर, तृप्ती बांदेकर, स्नेहा सुतार, डॉ. गीता गावस, प्रा.अंजली चितळे, चित्रा क्षीरसागर, धनश्री कुरुंदवाडकर, वर्षा प्रभुगावकर, शर्मिला प्रभू, तेजश्री प्रभुगावकर, डॉ.स्वेता गावस, कविता आमोणकर, अनुया शिरोडकर, भक्ती सरदेसाई, मंदा सुगीरे, राधिका काळे कुलकर्णी, गौरी भालचंद्र, स्नेहा जोशी, समृद्धी केळकर आदींचा सहभाग होता. गोवाभरातील जवळ जवळ पन्नास कवी कवयित्री?नीं यात सहभाग घेतला होता. सर्व कवी कवयित्री?नीं एकापेक्षा एक दर्जेदार कविता सादर करून कार्यक्रम रंगतदार केला.