बिहारमध्ये कोरोना काळातील विवाह
बिहारच्या बेगूसरायमध्ये कोरोना महामारीच्या काळात झालेला एक विवाह चर्चेचा विषय ठरला आहे. या विवाहात वधू-वराने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत काठीच्या मदतीने परस्परांना हार घातले आहेत. सर्वत्र या विवाहाची चर्चा होऊ लागली आहे.
कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावण्याचे निर्देश आहेत. अशा स्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत विवाह करून लोकांना जागरुक करण्यात आले आहे. हा विवाह माझ्यासाठी स्मरणीय ठरणार आहे, विशेषकरून काठीच्या मदतीने घातलेला हा नेहमीच आठवत राहणार असल्याचे नवऱया मुलाने म्हटले आहे.
या विवाहसोहळय़ात 50 पेक्षा कमी लोक सहभागी झाले होते. तसेच नियमांसह शासकीय दिशानिर्देशांचे पालन करत हा विवाह सोहळा पार पाडण्यात आला आहे. वधू आणि वराने परस्परांदरम्यान सोशल डिस्टन्सिंग राखले होते.
हा अनोखा विवाह तेघरा बाजार येथे पार पडला आहे. कोरोना काळात विवाहांचा ट्रेंडच बदलला आहे. लोकांना अनेक निर्बंधांदरम्यान स्वतःचा आनंद व्यक्त करावा लागत आहे. पाहुण्यांचे फुलांऐवजी मास्क आणि सॅनिटायजरने स्वागत करण्यात येत आहे. याचबरोबर विवाहाच्या अनोख्या पद्धतीही अवलंबिल्या जात आहेत. अनेक लोक व्हिडिओ कॉलद्वारे विवाह सोहळय़ात सामील होत आहेत.