नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रवाशांची संख्या कमी झाल्याने रेल्वेने आपल्या अनेक रेल्वे गाडय़ा रद्द केल्या आहेत. उत्तर रेल्वे विभागाने शुक्रवारी सुमारे 11 विशेष गाडय़ा रद्द केल्याची घोषणा केली. रद्द केलेल्या गाडय़ा अमृतसर, पठाणकोट, अंबाला कँटोनमेंट, लुधियाना, फाजिका जंक्शन, बठिंडा, गोरखपूर, लखनौ, जबलपूर, हरिद्वार, आग्रा या मार्गावरील आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय रेल्वे निरंतर आणि मोठय़ा संख्येने गाडय़ा रद्द करत आहे. या गाडय़ा प्रवाशांची संख्या घटल्याने रद्द करण्यात आल्या आहेत.