हुल्लडबाजांनी साहित्य चोरल्याचेही प्रकार : सरकारी कार्यालयाचे गेटही तोडले
प्रतिनिधी /बेळगाव
कित्तूर चन्नम्मा चौक येथे राज्योत्सव साजरा करताना तरुणांनी हुल्लडबाजी करत त्या परिसरातील खोक्मयांची मोडतोड केली आहे. येथे गरीब चर्मकारांनी मोठय़ा कष्टाने खोकी घातली होती. मात्र त्यावर चढून त्याची नासधूस केली तर काही खोकी फोडून त्यामधील साहित्यदेखील लंपास केले आहे. फलोत्पादन खात्याच्या कार्यालयाचे गेट उचकटून टाकण्यात आले. या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. राज्योत्सव म्हणजे गरिबांना त्रास देण्याचा प्रकार ठरू लागला आहे.
राज्योत्सवासाठी इतर जिल्हय़ांतून बेळगावमध्ये मोठय़ा संख्येने लोक उपस्थित होते. ‘बेळगाव आपले आहे’ हे दाखविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली होती. ये-जा करण्यासाठी मोफत बस, याचबरोबर जेवणाची व्यवस्था केल्यामुळे धारवाड, हुबळी, गदग आदी परिसरातून मोठय़ा संख्येने लोक उपस्थित होते. याचबरोबर बेळगाव जिल्हय़ातील विविध तालुक्मयांमधूनही जनता आली होती. केवळ हुल्लडबाजी करून राज्योत्सव करण्याचा प्रयत्न झाला. मात्र यामुळे बेळगावमधील जनतेलाच मोठा त्रास सहन करावा लागला. यामुळे व्यापारी, डॉक्टर व इतर क्षेत्रातील मंडळींकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
केवळ कित्तूर चन्नम्मा चौकच नव्हे तर कॉलेज रोडवरील अनेक दुकानांचे फलकदेखील फोडण्यात आले. याचबरोबर शहरातील विविध संस्थांच्या फलकांचीदेखील मोडतोड केली आहे. राज्योत्सव कशासाठी केला जातो, हेच माहिती नव्हते. मात्र केवळ हुल्लडबाजीसाठी हा राज्योत्सव करण्यात आल्याचे दिसून आले. याबद्दल व्यापारीवर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. इतर भाषिकांनी मात्र घोषणाबाजी केली तरी त्यांच्या विरोधात आक्रोश केला जातो. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात. आता इतक्मया घटना घडल्या आहेत, तेव्हा पोलीस प्रशासन या हुल्लडबाजी करणाऱयांवर गुन्हे दाखल करणार का? असा प्रश्न समस्त बेळगावकरांतून उपस्थित होत आहे.