आमदार आलेक्स लॉरेन्स यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
प्रतिनिधी /मडगाव
काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना तेलगोळय़ांसंदर्भात पत्र पाठवले आहे. सावंत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. सागरी जीवनावर परिणाम करणाऱया तेलगोळय़ांमुळे गोव्यात भावी परिणामांचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याची पर्यटन उद्योगाला झळ पोहोचणार असल्याचे लॉरेन्स यांनी नजरेस आणून दिले आहे.
मुख्यमंत्र्यांचे लक्ष गोव्याच्या दोन्ही जिह्यांतील समुद्रकिनाऱयांवर आलेल्या तेलगोळय़ांकडे आकर्षित करून मच्छीमार, अन्य स्थानिक लोक, समुद्रप्रेमी, पर्यटन व्यवसायातील घटक इत्यादींना लॉरेन्स यांनी विनंती केली आहे, की त्यांनी तेलगोळय़ांनी काळवंडलेले समुद्रकिनारे मुक्त करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा.
दरवषी मे ते ऑक्टोबरदरम्यान तेलगोळे किनाऱयांवर पाण्याच्या प्रवाहासह येत असतात. परिणामी पाणी आणि समुद्रकिनारा प्रदूषित होत असतो. हणजूण, मोरजी, मांदे, कोलवा, बाणावली, वेळसांव असे जवळपास राज्यातील सर्व किनारे काळवंडल्याचे नुकतेच आढळून आले आहे, याकडे लॉरेन्स यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
तेलगोळे हे वरदान नसून गोवा आणि गोमंतकीयांसाठी संकट आहेत. कारण सागरी जीवन नष्ट करण्याबरोबरच ते निसर्गासाठी देखील हानिकारक आहेत. त्यातील धातूंचे हायड्रोकार्बन अवशेष उपद्रवी आहेत. कारण यामुळे डोळे जळजळतात तसेच त्वचेवर परिणाम होऊन ऍलर्जी होते, असा दावा त्यांनी केला आहे. तेलगोळय़ांनी प्रभावित झालेल्या किनाऱयांवर चालणे स्थानिक आणि पर्यटकांसाठी एक आव्हान बनते. कारण तेलगोळे त्यांच्या अनवाणी पायांना चिकटतात. या समस्येवर उपाय काढणे काळाची गरज आहे, असे लॉरेन्स यांनी नजरेस आणून दिले आहे. सर्व प्रभावित किनाऱयांची साफसफाई करून तेलगोळय़ांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.