तलावात साचलेला प्लास्टिक कचरा त्वरित हटविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने गटारी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे आरटीओ सर्कल, शिवाजीनगर येथील सर्व गल्ल्यांचे सांडपाणी गटारीमार्गे किल्ला तलावाभोवती असलेल्या गटारीतून वाहत जाऊन किल्ला तलाव परिसरात प्लास्टिकचे साम्राज्य पसरले आहे.
गटारीतील सांडपाण्यातून प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या वाहून गेल्याने किल्ला तलाव परिसरात सध्या अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले निदर्शनास येत आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱया किल्ला तलावात सध्या प्लास्टिक कचऱयाचे साम्राज्य असल्याने समस्या निर्माण झाली आहे.
गतवषी येथील गटारी साफ न केल्याने शिवाजीनगर पहिली गल्ली दुसरा क्रॉस येथे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले होते. त्यामुळे ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, याकरिता गेल्या आठवडय़ातच गटारी साफ करण्यात आल्या. मात्र असे असले तरी किल्ला तलाव परिसरात कचऱयाचे साम्राज्य पसरलेले दृष्टीस पडत आहे.
तलावाच्या पाण्यातही प्लास्टिक कचरा मिसळल्याने तलावातील जलचरांचा जीव धोक्मयात आला आहे. त्यामुळे तलाव सुधारणा प्राधिकरण मंडळाने याकडे त्वरित लक्ष देऊन किल्ला तलावात साचलेला प्लास्टिक कचरा त्वरित हटवावा आणि परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.