प्रतिनिधी / बेळगाव
सांबरा येथील 22 महिन्यांच्या बालकाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी सरकारला धडा शिकविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्या ठिकाणी सरकारच्या चुकीमुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे त्या कुटुंबीयांना 1 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
भटक्मया कुत्र्यांनी सांबरा येथे 28 नोव्हेंबर 2018 रोजी लहान मुलावर हल्ला केला होता. यामध्ये अब्बास अली हा मुलगा गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर मारिहाळ पोलीस स्थानकात त्या मुलाच्या कुटुंबीयांनी फिर्याद दाखल केली. जिल्हाधिकारी, जि. पं., ग्रा. पं. यांच्याकडेही तक्रारी देण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर युसुफ सनदी यांनी उच्च न्यायालयात सरकारविरोधात याचिका दाखल केली. ऍड. संतोष पुजारी यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केल्यानंतर वाद-प्रतिवाद झाले. न्यायालयाने याचिकाकर्त्याची बाजू ऐकून घेऊन त्या मुलाच्या कुटुंबीयांना 1 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. भटक्मया कुत्र्यांनी किंवा रस्त्यांवरील अडथळय़ांमुळे अपघात झाला तर त्या विरोधात आपणाला याचिका दाखल करता येते. तेव्हा यासाठी आता जनतेनेच पुढे यावे, असे आवाहन ऍड. संतोष पुजारी यांनी केले आहे.