ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील मनगोरीपरिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले. आज सकाळी ही चकमक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील मनगोरी परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानुसार सुरक्षा दलाने परिसराला घेराव घालून शोधमोहीम हाती घेतली. त्यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले.दहशतवाद्यांकडून होणाऱ्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.