प्रतिनिधी/ मडगाव
केंद्र सरकारने लोकसभेत संमत केलेल्या तीन कृषी विधेयके संदर्भात विरोध करण्याकरिता दक्षिण गोवा काँग्रेस समितीतर्फे मडगाव लोहिया मैदानावर अहिंसा पद्धतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तिन्ही कृषी विधेयके शेतकऱयांच्या विरोधात आहे. त्यामुळे या विधेयकला विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेसतर्फे ‘स्वाक्षरी अभियान’ सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण गोवा काँग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस यांनी दिली.
मडगाव लोहिया मैदानावर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी सुभाष फळदेसाई, एम. के. शेख, आग्नेलो गोम्स व इतर काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सदर विधेयके रद्द करण्याकरिता देशातील नागरिकाकडून दोन कोटी स्वाक्षरी केलेले पत्र पंतप्रधानाला पाठविले जाणार आहे. तसेच गोव्यातून पन्नास हजार लोकांनी स्वाक्षरी केलेले पत्र सोनिया गांधी यांना पाठविले जाईल असे डायस यांनी यावेळी सांगितले.
केंद्र सरकारने संमत केलेली कृषी विधेयके शेतकऱयांच्या हिताहाड आहे. याचा फायदा शेतकऱयांना होणार नाही. याचा फायदा कॉर्पोरेट लोकांना होणार आहे. या विधेयकामुळे सर्व सामान्य जनतेचेही नुकसान होणार आहे. कारण, पालेभाज्या व फळांचे दर कॉर्पोरेट क्षेत्रातील लोक ठरवतील. काँग्रेस पक्षाला लोकांनी वाईट नजरेने बघावे याकरिता भाजप प्रयत्न करत आहे. काँग्रेसने नेहमीच शेतकऱयांच्या हितासाठी कार्य केलेले आहे. सरदार वल्लवभाई पटेल हे सदैव शेतकऱयांच्या हितासाठी लढले. शेतकऱयांना आधारभूत किंमत देण्याची योजना ही पंडीत जवाहरलाल नेहरुची संकल्पना होती असे एम. के. शेख म्हणाले.