प्रतिनिधी/ बेळगाव
पावसाळय़ात रेल्वेपुलांवरील पाण्याची पातळी वाढत असते. त्याची माहिती समजावी, याकरिता रेल्वे विभागाने कृष्णा व मलप्रभा नदीवर आधुनिक यंत्रणा बसविली आहे. यामुळे पाण्याची पातळी वाढताच त्याची माहिती रेल्वे विभागाला समजणार आहे.
लेंढा-मिरज मार्गावरील मलप्रभा नदीवर गुंजी ते खानापूर दरम्यान तर कृष्णा नदीवर कुडची ते उगार खुर्द दरम्यान ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. पाणी वाढताच सायरन वाजून धोक्मयाची घंटा वाजणार आहे. त्याची माहिती एसएमएसच्या माध्यमातून रेल्वेला मिळणार आहे. इंटेलिजंट रिव्हर लेव्हल मॉनिटरींग एन्स्ट्रूमेंट या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
या ठिकाणी तंत्रज्ञानाला वीजपुरवठा करणे शक्मय नसल्याने सौरउर्जेचा वापर करण्यात आला आहे. अंदाजे 10 लाख रुपये खर्च करून ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. रेल्वे अधिकारी विजय अगरवाल व कौशलकिशोर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मागीलवषी मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कृष्णा नदीने धोक्मयाची पातळी ओलांडली होती. त्यामुळे ही यंत्रणा यावषी उभारण्यात आली आहे.