प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात भटक्मया जनावरांचा उपद्रव वाढत आहे. भटक्मया जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांना पकडण्याची कारवाई केली जाते. मात्र, सदर जनावरांना ठेवण्यासाठी महापालिकेकडे गो-शाळा नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत गो-शाळा उभारण्यात आली असून, हे काम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. परिणामी जनावरे पकडण्याची मोहीम थंडावली आहे. सदर काम कधी पूर्ण होणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
शहरातील विविध चौक, प्रमुख रस्ते आणि बाजारपेठेत भटकी जनावरे ठाण मांडून बसत आहेत. परिणामी वाहतुकीस अडथळा होत आहे. भटकी जनावरे भाजी विपेत्यांचे नुकसान करीत आहेत. कचराकुंडीत टाकण्यात आलेला कचरा जनावरे खात असल्याने त्यासोबत प्लास्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात जात आहेत. अशा विविध समस्या जनावरांमुळे निर्माण होत आहेत. या भटक्मया जनावरांना पकडण्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होते. नागरिकांच्या मागणीनुसार महापालिकेकडून भटक्मया जनावरांना पकडण्याची कारवाई करून गो-शाळेत दाखल करण्यात येते. पण त्या ठिकाणी जनावर मालक धाव घेऊन ही जनावरे पुन्हा सोडवून घेऊन येतात. त्यामुळे दोन दिवसांनंतर हीच जनावरे रस्त्यावर मोकाटपणे फिरत असतात. जनावरे पकडण्याच्या वेळी महापालिकेच्या कर्मचाऱयांवर दगडफेक झाल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. जनावरे पकडताना कर्मचाऱयांमध्ये व जनावर मालकांमध्ये वारंवार वादावादी होत असते. ही जनावरे ठेवून घेण्यास गो-शाळा चालकांनीदेखील नकार दिला आहे. त्यामुळे ही कारवाई काटेकोरपणे राबविली जात नाही.
जनावरे ठेवण्यासाठी महापालिकेनेच प्रशस्त अशा जागेत स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कॅटल शेडची उभारणी केली आहे. सदर शेडची उभारणी होऊन सहा महिने झाले पण अद्याप महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आले नाही. शेडची उभारणी झाल्यानंतर क्षुल्लक कामे प्रलंबित आहेत. शेडमध्ये जनावरांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली नाही. विद्युत जोडणीही करण्यात आली नाही. चारीही बाजूने चिखल असल्याने काँक्रीट घालणे आवश्यक आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतरच कॅटलशेड जनावरांसाठी उपलब्ध होणार आहे. पण कॅटलशेडच्या अर्धवट कामामुळे जनावरे पकडण्याची मोहीम राबविण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे कॅटलशेडचे काम तातडीने पूर्ण करून भटक्मया जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.