प्रतिनिधी / बेळगाव
नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या स्वच्छतागृहाची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. वेळच्या वेळी स्वच्छता केली जात नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डने या स्वच्छतागृहाची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
खानापूर रोड, उभ्या मारुतीसमोर काही दिवसांपूर्वी स्वच्छतागृहाची व्यवस्था केली होती. बेळगाव शहरात येणाऱया नागरिकांसाठी ती सोयीची ठरत होती. चारचाकी वाहने लावणाऱयांना हे स्वच्छतागृह उपयुक्त ठरत होते. परंतु मागील काही दिवसांपासून स्वच्छता न झाल्याने दुर्गंधी पसरत आहे. या रस्त्याने ये-जा करणाऱयांना याचा सामना करावा लागत असल्याने स्वच्छता करण्याची मागणी करण्यात येत आहे.