प्रतिनिधी / मिरज
केंद्रीय जल आयोगाच्या कार्यकारी अभियंता अभिषेक गौरव यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा नदीच्या पूरपट्टयात शुक्रवारी धावती भेट देण्यात आली. या पथकाने अर्जुनवाड, कुरुंदवाड, तेरवाड सदलगा समडोळी आदी केंद्राना भेटी देऊन जलभ्यासकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासह जुलै महिन्यात आलेल्या महापुरात केलेल्या कामाचे कौतुक केले.
कुरुंदवाड येथे पाण्याच्या प्रचंड वेगाने या केंद्राच्या पाणी मोजणीसाठी उभारण्यात आलेले रोपवेचे दोन्ही टॉवर कोसळून पडले आहेत. तर समडोळी येथे ही रोपवे तुटला आहे. तसेच सर्वच केंद्राच्या परस्थितीची पहाणी करण्यात आली. शिवाय सर्वच केंद्राच्या अडचणी समजावून घेण्यात आल्या पूरस्थिती कामकाज बद्दल समाधान व्यक्त करण्या बरोबर अडचणीवर मात करत सर्वच केंद्राचे कामकाज अखंडित ठेवण्यावर भर देण्यात आला. या पथकात अभिषेक गौरव कार्यकारी अभियंता, किसन रावलानी कनिष्ठ अभियंता, रुपेश कुमार यादव कनिष्ठ अभियंता, बोया रमेश कुशल कार्य सहाय्यक, गोपी सिंग कुशल कार्य सहाय्यक आदी चा समावेश होता.