ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील कांद्याच्या दरांमध्ये झालेली वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांद्यावर निर्यातबंदी घालती आहे. डायरेक्ट्ररेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेडने यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.
मागील काही दिवसात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 15 ते 20 रुपयांनी मिळणारा कांदा आता 40 ते 45 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचला आहे. भारताने एप्रिल ते जून या कालावधीत 19.8 कोटी डॉलर कांदा निर्यात केला आहे. मागणी आणि पुरवठ्यात तफावत असल्याने देशात कांद्याचे दर वाढले असून, ही दरवाढ रोखण्यासाठी मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातली आहे.
निर्यात बंदी लागू झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून येणारा चांगल्या प्रतीचा कांदा भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होईल. कांद्याची आवक वाढली की दर घसरतील. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशावरील बोजा कमी होईल.