ममता बॅनर्जी यांनी सादर केला वादळ हानीचा अहवाल
वृत्तसंस्था / कोलकता
पश्चिम बंगाल आणि ओरीसा यांना तडाखा दिलेल्या यास या वादळामुळे झालेल्या हानीचा अहवाल ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दिला आहे. त्यांनी पश्चिम बंगालसाठी केंद्र सरकारकडे 20 हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. यापैकी 10 हजार कोटी रुपयांची मागणी घरे व मालमत्तांच्या दुरुस्तीसंबंधी आहे. ओरीसा सरकारनेही केंद्राकडे दिर्घकालिन उपाययोजनांची आवश्यकता व्यक्त केली असून सहाय्य मागीतले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही राज्यांमधील हानीग्रस्त भागांची हेलिकॉप्टरमधून पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आपत्ती निवारण कार्यासंबंधी अधिकाऱयांची तसेच मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. शुक्रवारी ममता बॅनर्जी यांनी त्यांची भेट घेतली व परिस्थितीवर चर्चा केली. मात्र त्या अधिकृत बैठकीला अनुपस्थित राहिल्याने मोठा वाद निर्माण झाला. ममता बॅनर्जी अहंकारी असल्याने त्या पंतप्रधान मोदींच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्या, अशी टिका भाजपने केली.
एक हजार कोटीचे सहाय्य
पंतप्रधान मोदी यांनी वादळग्रस्त भागाच्या सहाय्यासाठी एक हजार कोटी रुपयाचे अनुदान त्वरित घोषित केले. हे अनुदान ओरीसासाठी असून त्यातील पाचशे कोटी रुपये त्वरित उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान निधीतून प्रत्येक मृतामागे दोन लाख रुपयांची तर प्रत्येक जखमी मागे 50 हजार रुपयांची सहाय्याता रक्कम घोषित केली आहे.
दिर्घकालिन उपायांची आवश्यकता
वादळांच्या संकटापासून लोकांची जीव आणि मालमत्ता यांचा बचाव करायचा असेल तर दिर्घकालिन उपाययोजनांची आवश्यकता आहे. केवळ तात्पुरती मलमपट्टी करून भागणार नाही. अशी सूचना ओडिशा सरकारकडून केंद्र सरकारला करण्यात आली आहे. नेहमी वादळे तडाखा देतात. त्या भागांमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची कार्यालये स्थापन करावीत. म्हणजे सहाय्यता वेळीच पाठविणे शक्य होईल. अशी सूचना ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केली. पंतप्रधान मोदी यांनी सर्वांकडून सूचना व निवेदने स्विकारून महत्त्वाचे निर्णय घेतले.
ओडिशात आगमण
पंतप्रधान मोदी यांचे वादळग्रस्त भागाच्या दौऱयासाठी ओडिशातील भुवनेश्वर विमानतळावर आगमण झाल्यानंतर राज्य सरकारच्या अधिकाऱयांशी त्यांनी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर हेलिकॉप्टरमधून वादळग्रस्त भागाची पाहणी त्यांनी केली. या वादळात या दोन राज्यांमध्ये दोन लाखाहून अधिक घरांचे लहान मोठी हानी झाली आहे.
वादळातही राजकारण सुरुच
– पश्चिम बंगालची 20 हजार कोटींची मागणी.
– ममता बॅनर्जी अनुपस्थित राहिल्याने नवा वाद.
– पंतप्रधान मोदी यांनी घेतला हानीचा आढावा.
– पंतप्रधान मोदींकडून एक हजार कोटीचे सहाय्य.